आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनआंदोलन समितीने दिली माहिती:‘पाडळसरे’साठी 51 हजार‎ पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठवणार‎

अमळनेर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील पाडळसरे धरणाचे काम‎ वेगाने व्हावे, यासाठी केंद्र सरकारच्या‎ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाडळसे‎ धरणाचा समावेश करावा, या‎ मागणीसाठी अमळनेरातील विद्यार्थी व‎ नागरिकांनी लिहिलेले ५१ हजार‎ पोस्टकार्ड, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ९‎ रोजी पाठवले जाणार आहेत. प्रारंभी‎ मिरवणूक काढून नंतर पोस्टकार्ड पत्रपेटीत‎ टाकून रवाना केले जातील, अशी माहिती‎ पाडळसरे धरण जनआंदोलन समितीच्या‎ पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.‎ सार्वजनिक हिताच्या प्रश्नासाठी‎ मोठ्या संख्येने पोस्टकार्ड पाठवण्याचा‎ विक्रम अमळनेरात नोंदवला जाईल.‎ धरणाचे काम २३ वर्षांपासून रखडल्याने‎ पाडळसे धरण जनआंदोलन समिती‎ वेळोवेळी आंदोलने करत आहे. या‎ प्रकल्पाला आता केवळ केंद्र सरकारच्या‎ योजनेतूनच अपेक्षित निधी मिळू शकतो.‎

‎‎‎‎‎‎‎‎‎ म्हणून महाराष्ट्र शासनाच्या संबंधित‎ विभागाच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा‎ सुरू असूनही उपयोग होत नाही. त्यामुळे‎ शासनाचे लक्ष वेधण्यासाठी‎ लाभक्षेत्रातील जनतेकडून पोस्टकार्ड‎ लिहून घेण्याचे आंदोलन मागील चार‎ महिन्यांपासून सुरू होते, अशी माहिती‎ पाडळसे धरण जनआंदोलन समितीचे‎ प्रमुख सुभाष चौधरी, रणजित शिंदे यांनी‎ दिली. यावेळी जनआंदोलन समितीचे‎ हेमंत भांडारकर, रामराव पवार, महेश‎ पाटील, हिरामण कंखरे, सुनिल पाटील,‎ राजू देसले, नारायण बडगुजर हजर होते.‎

...तर मतदानावर बहिष्कार‎ आंदोलनात हजारो विद्यार्थी, नागरिक‎ आणि विविध संघटनांनी सहभाग‎ नोंदवला. पाडळसे धरणाचा समावेश‎ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत न‎ झाल्यास, लाभक्षेत्रातील जनता येणाऱ्या‎ निवडणुकीत मतदानावर बहिष्कार‎ टाकेल, असा इशारा पत्राद्वारे दिला आहे.‎

बातम्या आणखी आहेत...