आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पाडळसरे धरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे यासाठी जन आंदोलन समितीच्या ५१ हजार पत्र लेखन आंदोलनाला उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जानवे येथे हळदीच्या समारंभात वधू-वर आणि वऱ्हाडी मंडळींनीही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या नावे पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदवला. तालुक्यातील विकासोंच्या सचिवांनीही मासिक सभेत पत्र लिहून आंदोलनात सहभाग नोंदवला आहे.
जानवेचे माजी सरपंच भटू पाटील यांचे सुपूत्र शुभम पाटील व श्रीराम देवरे यांची कन्या गायत्री यांनी हळदीच्या कार्यक्रमात, पाडळसरे धरणासाठी वेळ काढून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले. शिवधर्म पद्धतीने पार पडलेल्या या लग्न सोहळ्यात आर.बी.पाटील, वसुंधरा लांडगे यांनी विधिवत कार्य पार पाडले. सोबत सामाजिक कार्यात योगदानाचा आदर्श निर्माण केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.