आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र शासनाने गेल्या डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियातून तीन लाख कापूस गाठी (५१ हजार टन कापूस), ११ टक्के टॅक्स माफ करून आयात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे देशांतर्गत उत्पादीत कपाशीच्या दरात घसरण झाली आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळत नसल्याची स्थिती आहे, असा भूमिका पाचोरा येथील नीळकंठ पाटील यांनी मांडली.
कापूस आयातीच्या निर्णयाविरोधात त्यांनी दि.३ रोजी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. कापूस आयातीमुळे बाजारभावात घसरण होऊन, कापसाचे दर कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा लागवडीचा खर्चही निघत नाही.
हिवाळी अधिवेशनात राज्याच्या कृषीमंत्र्यांनी कापसाला १२ हजार ३०० रुपये, सोयाबीनला ८ हजार ७०० रुपये प्रतीक्विंटल हमीभाव करावा म्हणून केंद्राला पत्र देखील लिहिले आहे. एकीकडे अवेळी कापसाची परदेशातून टॅक्स फ्री आयात वाढल्याने हमीभाव वाढवून मिळावा म्हणून कृषीमंत्र्यांनी केंद्राला साकडे घातले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला भाव मिळवून देण्यासाठी नीळकंठ पाटील यांनी, शासनाकडे पाठपुरावा करून दि. ३ रोजी, खंडपीठात पी.आय.एल.एस.टी. ३६१४ /२०२३ नुसार शासनाच्या निर्णयाला आव्हान दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.