आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाजाचे, कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय यावल आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने, कृषी विषयक जनजागृतीचा कार्यक्रम घेण्यात आला. प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रभेट आयोजित करण्यात आली. महाविद्यालयातील विद्यार्थिनी, प्राध्यापक उपस्थित होते. यावलचे कृषी अधिकारी एस.बी.सिनारे यांच्या मार्गदर्शनाखाली कैलास बारेला व एम.एस.मिटके यांनी महाविद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले. कैलास बारेला यांनी पोषण आहाराविषयी तृणधान्य वापराचे महत्व सांगितले.
तर कृषी सहाय्यक एस.बी.मिटके यांनी कृषी विषयक विविध योजना, कृषी अवजारे तसेच सेंद्रिय शेती या विषयांवर भर दिला. उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार, विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा.एस.पी.कापडे उपस्थित होते. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा.ए.पी.पाटील होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विषमुक्त आहार व त्याचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर या कार्यक्रमाला महाविद्यालयातील डॉ.अनिल पाटील, डॉ.संतोष जाधव, प्रा.कामडी. प्रा पवार, प्रा.कोष्टी, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.मोरे यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन रोहिणी अहिरे यांनी केले, आभार प्राची पाटील यांनी मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.