आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करास्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास शासकीय निर्देशानुसार ६ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला असून येथील श्री.गो.से. हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘हर घर तिरंगा’चा नारा दिला. प्रत्येक भारतीयाने स्वतःच्या घरावर ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव’प्रसंगी तिरंगा फडकवण्याचे आवाहन रॅलीतून करण्यात आले.
रॅलीची सुरुवात मुख्याध्यापक पी.एम. वाघ यांनी विद्यार्थ्यांना विविध सूचना देऊन गो.से. हायस्कूल येथून केली. याप्रसंगी पर्यवेक्षक आर.एल. पाटील, एन.आर. ठाकरे, ए.बी. अहिरे, सांस्कृतिक विभाग प्रमुख आर.बी. तडवी, सी.एल. जाधव, ए.व्ही. पाटील, एम.आर. सोमवंशी, स्मिता सोनवणे आदी शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते. ही रॅली यशस्वी करण्यासाठी एम.जे. चिंचोले, एल.टी. पाटील, एम.आर. देवरे, स्वप्निल जाधव, सिद्धांत जगताप यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.