आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्तृत्वाचा गौरवशाली‎ इतिहास साजरा:‘युवा संवाद भारत @ 2047’‎ कार्यक्रमासाठी मागवले अर्ज‎

जळगाव‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय‎ स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा‎ ७५व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या लोकांचा,‎ संस्कृतीचा आणि कर्तृत्वाचा गौरवशाली‎ इतिहास साजरा करण्यात येतो आहे. ‘अमृत‎ कालच्या काळातील भारत @ 2047ची‎ झलक’ या संदर्भात, युवा कार्यक्रम आणि‎ क्रीडा मंत्रालय आणि त्यांची स्वायत्त संस्था‎ नेहरू युवा केंद्र संघटन १ एप्रिल ते ३१ मे २०१३‎ या कालावधीत देशभरातील सर्व जिल्ह्यात‎ समुदाय आधारित संस्थांमार्फत ‘युवा‎ संवाद-भारत @ 2047’ या कार्यक्रमाचे‎ आयोजन करत आहे.‎ हा कार्यक्रम टाऊन हॉल स्वरूपात‎ आयोजित केला जाईल. ज्यात तज्ज्ञ /‎ जाणकार व्यक्ती असतील. पंचप्राणवर चर्चा‎ करतील. किमान ५०० तरुणांच्या सहभागासह‎ प्रश्नोत्तरे हे एक सत्र होईल.

आयोजक‎ समुदायास २० हजार रुपयांपर्यंत प्रतिपूर्ती केली‎ जाईल. समुदाय गैर-राजकीय, पक्षपाती‎ नसलेला इतिहास असणे आवश्यक आहे.‎ युवा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यासाठी‎ पुरेसे संघटनात्मक बळ असायला हवे. संस्था‎ विरुद्ध कोणताही फौजदारी खटला प्रलंबित‎ नसावा. जिल्ह्यातील जास्तीत जास्त तीन‎ समुदाय निवडले जातील. निकष पूर्ण करणारे‎ समुदाय हे नेहरू युवा केंद्र जळगाव‎ (महाराष्ट्र) पत्ता-गट क्रमांक ४०, प्लॉट‎ क्रमांक ६०, द्रौपदीनगर, जळगाव, पिन‎ ४२५००१ येथून प्राप्त विहित नमुन्यात अर्ज‎ सादर करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम‎ तारीख २० मार्च आहे. दिलेल्या मुदतीतच अर्ज‎ पाठवावे.

बातम्या आणखी आहेत...