आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदाेलन:शेतीमालास योग्य भावासह विविध‎ मागण्यांसाठी पाचोऱ्यात सेनेचे धरणे‎

पाचोरा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकार परदेशातून कापसाच्या‎ गाठी आयात करत असल्याने‎ स्थानिक बाजारपेठेत कापसाचे भाव‎ कमी झाले आहेत. या शिवाय‎ शासन सोयाबीन व तूरही आयात‎ करत असून ती त्वरित थांबवावी,‎ गायरान अतिक्रमण नियमित करा,‎ शेतकऱ्यांना २४ तास वीजपुरवठा‎ करावा यासह अन्य विविध‎ मागण्यांसाठी उद्धव बाळासाहेब‎ ठाकरे शिवसेनेच्या वतीने येथील‎ तहसील कार्यालयासमाेर नेत्या‎ वैशाली सूर्यवंशी व अन्य‎ पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वात‎ एकदिवसीय धरणे आंदाेलन‎ करण्यात अाले.‎ खान्देशात कापसाचे प्रमुख पीक‎ असून त्यासही योग्य भाव मिळत‎ नसल्यामुळे शेतकरी कापूस‎ विकण्यास धजावत नाही. यामुळे‎ उधारीवर घेतलेले बी-बियाणे, खते‎ व औषधी यांची देणी फेडण्यासाठी‎ व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीचा‎ तगादा लावला आहे. शेतकरी‎ चहुबाजूने भरडला जात आहे.‎ शेतकऱ्यांशी संबंधित विविध‎ धरणे आंदाेलनास बसलेल्या वैशाली सूर्यवंशी, दीपक राजपूत, उद्धव मराठे, शरद पाटील, अरुण पाटील व कार्यकर्ते.‎

मागण्यांसाठी उद्धव ठाकरे‎ शिवसेनेच्या नेत्या वैशाली नरेंद्रसिंह‎ सूर्यवंशी, जिल्हाप्रमुख दीपक‎ राजपूत, उपजिल्हाप्रमुख उद्धव‎ मराठे, तालुकाप्रमुख शरद पाटील,‎ शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण‎ पाटील, तालुकाप्रमुख रमेश बाफना‎ यांच्या नेतृत्वाखाली हे एकदिवसीय‎ धरणे आंदोलन करण्यात आले.‎ येथील तहसीलदार‎ कार्यालयासमोर झालेल्या या‎ आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे‎ शहरप्रमुख अनिल सावंत,‎ अॅड.दीपक पाटील, पप्पू राजपूत,‎ भरत खंडेलवाल, फईम शेख,‎ देविदास पाटील, बापू पाटील,‎ नीलेश गवळी, खंडू सोनवणे, माजी‎ नगरसेवक दत्ता जडे, धर्मेंद्र चौधरी,‎ सुनील डांबले, ज्ञानेश्वर चौधरी,‎ प्रेमचंद पाटील, अण्णा परदेशी,‎ रमेश पाटील, धरमसिंग पाटील, पप्पू‎ जाधव, माजी जि.प. सदस्य राजेंद्र‎ पाटील, तिलोत्तमा मौर्य, मंदाकिनी‎ पारोचे, जयश्री येवले, अनिता‎ पाटील, कुंदन पांड्या, जितेंद्र जैन,‎ रितेश जैन, राजेंद्र राणा, शांताराम‎ माळी, छोटूसिंग पाटील यांच्यासह‎ पदाधिकारी व शेतकरी मोठ्या‎ संख्येने उपस्थित होते. यावेळी‎ टाेपल्यांमध्ये कापूस ठेवला हाेता.‎

या मागण्यांसाठी झाले आंदाेलन‎ कापसाला १० हजार तर सोयाबीन तूर व सूर्यफुलाला ८ हजार रुपये भाव मिळावा, शेतीला २४ तास वीज द्या, शेती‎ पंपाची मागील वसुली माफ करा, गायरान अतिक्रमण नियमित करा, पाचोरा व भडगाव तालुक्यांचा पोखरा योजनेत‎ समावेश करावा, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची नुकसान भरपाई मिळावी अशा विविध मागण्यांसाठी हे‎ आंदाेलन करण्यात आले. शेतकरी माेठ्या अडचणीत असून शासनाने मदत करावी,अशी मागणी केली.‎

बातम्या आणखी आहेत...