आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाढती सायबर गुन्हेगारी समाजासाठी धोकेदायक असून सावधानता हाच बचावाचा मुख्य उपाय आहे, असे प्रतिपादन मारवड पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी केले. मारवड महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सायबर गुन्हेगारीबाबत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व कै. न्हानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालय, मारवड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित, आत्मनिर्भर युवती अभियानांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन झाले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मारवड पोलिस ठाणे येथे सायबर क्राईम या विषयावर उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
वाढती सायबर गुन्हेगारी, महिलांना येणारे निनावी फोन कॉल, रोडरोमियोद्वारा महिलांना होणारा त्रास, तसेच महिलांच्या हितासाठी असलेल्या कायद्यांबाबत विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना अधिकाऱ्यांनी उत्तर दिले. प्रा.डॉ.संजय पाटील, प्रा.डॉ.नंदा कंधारे, प्रा. किशोर पाटील हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.