आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीक्षांच्या कामांवर टाकलेला बहिष्कार मागे घेवून शासनाला सहकार्य करावे असे आवाहन शासनाच्यावतीने सहसंचालक प्रा. संतोष चव्हाण यांनी केले. मात्र याबाबत राज्यपातळीवर निर्णय घेतल्यावरच आंदोलन मागे घेण्यात येणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. परिणामी विद्यापीठाने सध्या सुरु असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. राज्यातील अकृषी विद्यापीठीय व संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी २ फेब्रुवारीपासून परीक्षांच्या कामावर बहिष्कार टाकला. या संदर्भात शिक्षण सहसंचालक प्रा. संतोष चव्हाण यांनी शुक्रवारी विद्यापीठात उमवि कर्मचारी संघटना व मागासवर्गीय कर्मचारी संघटना तसेच महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, कुलसचिव डॉ.विद्यापीठातील कर्मचारी संघटनांसाेबत चर्चा करताना शिक्षण सहसंचालक प्रा. संताेष चव्हाण, कुलगुरू व्ही. एल. माहेश्वरी, कुलसचिव डाॅ. विनाेद पाटील, प्रा. दीपक दलाल.
विनोद पाटील व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक प्रा. दीपक दलाल यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांच्या परीक्षांत व्यत्यय येवू नये. सर्व परीक्षा सुरळीत होवू द्याव्या असे आवाहन प्रा. चव्हाण यांनी केले. त्यावर संघटनांचे प्रतिनिधी अरूण सपकाळे, दुर्योधन साळुंखे, भय्या पाटील, वैशाली वराडे तसेच महाविद्यालयीन संघटनांचे प्रतिनिधी प्रसाद पाटील, विजय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासनाने लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये याकडे कर्मचाऱ्यांनी लक्ष द्यावे असे आवाहन केले. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी कर्मचारी संघटनांचे आभार मानले.
कर्मचाऱ्यांच्या भावना शासनाला सांगाव्या शासनाने प्रलंबित मागण्यांकडे गांभीर्याने बघावे व कर्मचाऱ्यांच्या भावना शासनाच्या कानावर घालाव्या असे आवाहन या प्रतिनिधींनी केले. राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीकडून हे आंदोलन पुकारले असल्याने जो निर्णय होईल तो राज्यपातळीवर होईल असे संघटना पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
आंदोलनामुळे परीक्षांना स्थगिती... अविष्कार, आव्हान यासोबतच क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविलेल्या ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा बाकी आहेत त्यांच्या परीक्षांना १ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र, दुसऱ्याच पेपरला कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकला. जळगाव, धुळे, नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचा यात सहभाग असल्याने सध्या सुरू असलेल्या परीक्षा पुढे ढकलण्यात आली. आंदोलन मागे घेतल्यानंतर नवीन वेळापत्रक जाहीर केले जाणार असल्याचे विद्यापीठातर्फे कळवण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.