आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावटसावित्री पौर्णिमेच्या आध्यात्मिक सणासोबत पर्यावरणाचा जागर करण्याचा संकल्प गेल्या १३ वर्षांपासून केला उमंग परिवाराने केला आहे. संस्थेने यंदाही महिलांना ३०० रोपांचे वाटप केले. वटपूजेला जमलेल्या महिलांना रोपांची भेट देऊन सर्वांनी पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेतली आहे. आज सलग १३ वर्षे हा उपक्रम सुरू असून ‘ग्लोबल वॉर्मिंग’चे संकट असताना येत्या काळात आध्यात्म आणि पर्यावरण याची वैज्ञानिक सांगड घालणे ही काळाची गरज असल्याची भावना उमंग महिला समाज शिल्पी परिवाराच्या संस्थापक अध्यक्षा संपदा पाटील यांनी व्यक्त केली. वटसावित्री पाैर्णिमेच्या निमित्ताने गेल्या १३ वर्षांपासून उमंग महिला परिवाराच्या वतीने पर्यावरण पूरक वटपौर्णिमा साजरी करण्यात येत अाहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही उमंगच्या संस्थापिका संपदा पाटील, अध्यक्षा साधना पाटील, रत्नप्रभा नेरकर, सारिका जैन, कविता पाटील, कल्पना पाखले यांच्यातर्फे पर्यावरण संवर्धनाची प्रतिज्ञा घेऊन व रोपांची भेट देऊन पर्यावरण जागर करण्यात आला. या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
उमंग महिला समाज शिल्पी परिवारातर्फे वाटप करण्यात आलेल्या रोपांचे संबंधित महिला संगोपन करणार आहेत. अशाप्रकारे शहरासह परिसरात पावसाळ्याच्या काळात हिरवळ खुलवली जाणार आहे. पारंपरिक सणावारांना पर्यावरणाची जोड दिल्याने, उमंग परिवाराच्या या उपक्रमाचे, पर्यावरणप्रेमींनीदेखील कौतुक केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.