आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याचिका फेटाळली‎:चोसाकाची निवडणूक अटळ,‎ 10 जणांची याचिका फेटाळली‎

चोपडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‎येथील चोसाका निवडणुकीसाठी सर्वपक्षीय‎ पॅनल तयार करण्यात आले आहे.‎ माघारीच्या दिवशी वेळेअभावी काही‎ उमेदवारांचे अर्ज माघार घेण्याचे राहून गेले.‎ अशा १० जणांनी उच्च न्यायालयात धाव‎ घेत याचिका दाखल करून, निवडणूक‎ लढवायची नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले‎ होते. मात्र सोमवारी उच्च न्यायालयाने‎ त्यांची याचिका फेटाळून लावली.

त्यामुळे‎ आता चोसाका निवडणूक अटळ आहे.‎ चोसाकाच्या निवडणुकीत माघारीच्या‎ दिवशी सर्वपक्षीय पॅनलला बिनविरोध‎ करण्यासाठी, विधानसभेचे माजी अध्यक्ष‎ अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास‎ पाटील यांनी पुरेपूर प्रयत्न केले.

मात्र,‎ माघारीची वेळ संपल्याने १० जणांचे अर्ज‎ कायम राहिले होते. या सर्वांनी निवडणूक‎ लढवायची नसल्याचे अर्ज न्यायालयाने‎ मंजूर करावेत, किंवा माघार गृहीत धरावी,‎ अशी याचिका दाखल केली होती. त्या‎ याचिकेवर दि.६ रोजी दुपारच्या सत्रात‎ औरंगाबाद खंडपीठात न्यायमूर्ती‎ चपळगावकर यांच्या समोर सुनावणी झाली.‎ सुनावणीत त्यांची याचिका फेटाळण्यात‎ आली. याचिकाकर्त्यांच्या वतीने‎ अॅड.अजित काळे यांनी काम पाहिले.‎

याआधीच अपक्ष उमेदवार प्रकाश रजाळे‎ यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे.‎ त्यामुळे आता चोसाका निवडणूक होण्यावर‎ शिक्कामोर्तब झाले आहे. घोडगाव येथील‎ रजाळे यांनी ऑनलाइन प्रचारही सुरु केला‎ आहे. या निवडणुकीत माजी आमदार‎ कैलास पाटील यांच्या गटाला एकही जागा‎ नसल्याने त्यांचे समर्थक नाराज आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...