आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील रस्ते आणि त्यावर दुकानदार, हातगाडीचालकांनी केलेले अतिक्रमण रहदारीसाठी अडचणीचे ठरत आहे. त्यामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भाजीपाला मार्केट, मुख्य बाजारपेठ, शनी मंदिररोड व थेट गोलमंदिरापर्यंतच्या मुख्य रस्त्यावर दररोज अनेकदा वाहतूक कोंडी होते. चोपडा शहरातील रहदारीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकारामुळे वाहनधारक आणि दुकानदारांमध्ये वादही होत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या समोरील भागात रस्त्यावर उभ्या असणाऱ्या भाजीपाल्याच्या गाड्यांमुळे समस्या वाढते.
तसेच मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बेशिस्तपणे हातगाड्या लावल्या जातात. पोलिसांचे वाहन सायरन वाजवत येताच, हातगाड्या मागे सरकवल्या जातात. मात्र, पोलिसांचे वाहन जाताच पुन्हा स्थिती जैसे थे होते. पालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बहुमूल्य वेळ वाहतूक कोंडीत वाया जातो.
पोलिस ठाण्यात प्रभारीराज
पालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी बी.टी.बाविस्कर यांनी काही वर्षांपूर्वी चोपडा शहरात, अतिक्रमण काढण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मात्र काही दिवसातच पुन्हा अतिक्रमण जैसे थे झाले होते. त्यामुळे मुख्य बाजारपेठेतील समस्या कायम आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासन व पोलिसांनी संयुक्त कारवाई करणे गरजेचे आहे. चोपडा शहर पोलिस ठाण्यात सध्या प्रभारी राज आहे. पूर्णवेळ पोलिस निरीक्षक नाहीत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.