आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुसावळ तालुक्यातील जाडगाव येथील पाणी वाहत असलेल्या नाल्यावर कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्वतः श्रमदानातून वनराई बंधारा साकारला आहे. वनराई बंधाऱ्यामुळे साचलेल्या पाण्याचा उपयोग गुरांना पाणी पिण्यासाठी होत आहे.
तसेच जलसंधारणामुळे शेतातील विहिरींना पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. भुसावळ तालुक्यातील अनेक ठिकाणी असे वनराई बंधारे बांधले आहे. तसेच जे नाले पाण्याने वाहत आहेत, अशा नाल्यांवर सुद्धा वनराई बंधारे बांधले जाणार असल्याचे कृषी अधिकारी दिलीप चाैधरी यांनी सांगितले. कृषी विभागाने राबवलेल्या या उपक्रमाचे परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.