आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुसक्या‎ आवळल्या:कापूस चाेरणारी पाच‎ जणांची टोळी जेरबंद‎ ; रांजणगावातील 7 क्विं.कापूस, वाहन जप्त‎

चाळीसगाव‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील रांजणगाव‎ शिवारातील शेतातील घराचा‎ कडीकोंडा तोडून, चोरट्यांनी‎ ४९ हजार रूपये किंमतीचा‎ सात क्विंटल कापूस चोरून‎ नेला होता. याप्रकरणी‎ चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी‎ ५ जणांच्या टोळीच्या मुसक्या‎ आवळल्या. या टोळीने‎ चोरलेल्या कापसासह १ लाख‎ रूपये किंमतीचे वाहन असा १‎ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल‎ जप्त केला.‎ रांजणगाव शिवारात मनोहर‎ माधव पाटे (वाणी)यांच्या‎ शेतात दि.१८ रोजी ही चोरी‎ झाली होती.

गुप्त माहितीवरुन‎ पोलिसांनी संशयित अजय‎ जयवंत पाटील (वय २५),‎ प्रकाश उर्फ मुन्ना लक्ष्मण‎ पाटील(वय २१, दोन्ही. रा.‎ रांजणगाव), चंद्रकांत उर्फ‎ बंटी गोकूळ मोरे (वय २५, रा.‎ जुना कोळीवाडा, पिलखोड),‎ शालिक अरुण पाटील, सुरेश‎ उर्फ पप्पू राजेंद्र कोष्टी (वय‎ २६, दोन्ही रा. रांजणगाव)‎ यांना ताब्यात घेतले.‎ संशयितांनी कापूस चोरीची‎ कबुली दिली. गुन्ह्यात‎ वापरलेले महिंद्रा पिकअप‎ वाहन (एमएच.०४‎ डीके.४६१०) जप्त केले.‎ संशयित चंद्रकांत उर्फ बंटी‎ गोकूळ मोरे याने चोरलेला‎ कापूस पिलखोड येथील‎ व्यापारी पवन दशरथ महाले‎ याला विकला होता. तसेच‎ कापूस माझ्या मालकीचा‎ आहे, असे सांगून तुमच्याकडे‎ कापूस ठेवा, पैसे नंतर घेऊन‎ जाऊ अशी बतावणी केली ‎.

बातम्या आणखी आहेत...