आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापातोंडा परिसर विकास मंचला महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाच्या वतीने विभागीय छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्रजासत्ताक दिनी प्रदान करण्यात आला. नाशिक येथील कार्यक्रमात मंत्री दादासाहेब भुसे यांच्या हस्ते विकास मंचचे सदस्य किरण शिंदे, उमेश पाटील, संदीप ठाकूर, घनश्याम पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मानपत्र, स्मृतिचिन्ह, ३० हजार रुपयांचा धनादेश असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार वृक्ष, पाणी, वन संपदा, जतन संवर्धन, महिला बाल जनजागृती केल्याबद्दल शासनाकडून दिला जातो. यंदा अमळनेर तालुक्यातील पातोंडा परिसर विकास मंचला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मंचचे सर्वत्र काैतुक हाेत आहे. या कामास कपिल पवार, प्राचार्य मगन सूर्यवंशी, रावसाहेब बोरसे, कन्हैया थोरात, विलास चव्हाण तसेच पातोंडा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांसह सरकारी अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. पातोंडा विकास मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे यानिमित्त सर्वत्र कौतुक होत आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मंचचे पदाधिकारी उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.