आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील कृष्णापुरी भागातील काही घरांचे अतिक्रमण काढण्याचे काम पूर्ण करावे, समोरील प्लॉटधारकांचे अतिक्रमणही काढून गल्लीत भूमिगत गटारी कराव्या, आदी विविध मागण्यांसाठी गुरुवारी स्थानिक महिलांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी व प्रशासक शोभा बाविस्कर यांना निवेदन दिले.
कृष्णापुरी भागातील अतिक्रमण संपूर्ण गल्लीत निघाले. परंतु जेथे गल्लीत जाण्यासाठी सुरुवात होते त्या घराचे अतिक्रमण न काढून नागरिकांवर अन्याय केला. तो त्वरित काढून तातडीने भूमिगत गटारीचे बांधकाम करावे, राहिलेले अतिक्रमण व गल्लीत सोडलेल्या सांडपाण्यामुळे काही जिवितहानी झाली तर त्यास पालिका अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहतील, असेही महिलांनी निवेदनात स्पष्ट नमूद केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.