आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजामनेर येथे भाजप सरकारविरुद्ध महाविकास आघाडीतर्फे गुरुवारी जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या वेळी बेरोजगारी भाव वाढीबरोबरच कापसाला भाव देण्याची मागणी करण्यात आली. पाचोरा रोडवरील महाराणा प्रताप चौकापासून तहसील कचेरीपर्यंत ट्रॅक्टर, बैलगाड्यांसह कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीतर्फे जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
या वेळी केंद्र व राज्य शासनाच्या फसव्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. बेरोजगारी, भाववाढ अशा विविध मुद्द्यांना हात घालून शेतकऱ्यांच्या कापसालाही १५ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी करण्यात आली. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, स्थानिक नेते संजय गरुड, तालुकाध्यक्ष विलास राजपूत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर राजपूत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. तहसील कचऱ्यावर तहसीलदार सुभाष कुंभार यांना निवेदन दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.