आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हळहळ:मुलाच्या लग्नाची अंतीम इच्छा पूर्ण‎ हाेताच आईने घेतला जगाचा निराेप, लग्न आटाेपल्यानंतर निघाली अंत्ययात्रा‎

वसंतराव पाटील | पाडळसरे‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

निम येथील कर्करोगाने ग्रस्त रुग्णालयात‎ ‎ दाखल असलेल्या‎ ‎आईची मुलाचे लग्न‎ ‎ पाहण्याची अंतिम इच्छा‎ ‎ हाेती. ही इच्छा पूर्ण‎ ‎ करण्यासाठी मुलाचे‎ ‎ लग्न ठरवण्यात आले.‎ ‎ परंतु, लग्न घटिका जवळ‎ ‎ येत असतानाच पुन्हा‎ आईच्या आजाराने डाेके वर काढले. तर‎ रुग्णालयात उपचार घेणाऱ्या आईने मुलाच्या‎ हळदीच्या दिवशीच रुग्णालयात मुलगा व‎ सुनेला जवळ बाेलावून आशीर्वाद दिले. तर‎ हळदीचा कार्यक्रम व्हिडिओ काॅलने पाहत‎ असतानाच आईने जगाचा निराेप घेतला.‎

अमळनेर तालुक्यातील निम येथील‎ सरलाबाई गुर्जर व गुलाब सुपडू गुर्जर यांनी‎ काळ्या मातीत घाम गाळून मुलगा व मुलीला‎ उच्च शिक्षित केले. मुलगा अभियंता तर‎ मुलीला पदवीधर केले. मुलीचे लग्न झाले,‎ मात्र मुलाला नोकरी लागताच आई‎ सरलाबाईला कर्करोगाने ग्रासले. यामुळे‎ सरलाबाईंची वर्षभरापासून प्रकृती चिंताजनक‎ हाेती.

मुलाचे लग्न माझ्या डोळ्यासमोर‎ व्हायला हवे, अशी भावना त्यांनी पती गुलाब‎ गुर्जर यांच्याकडे व्यक्त केली. त्यामुळे गुलाब‎ गुर्जर व त्यांचे बंधू राजेंद्र पाटील यांनी‎ अभियंता असलेला मुलगा राकेश याचा‎ चोपडा तालुक्यातील मंगरूळ येथील‎ शेती-निष्ठ परिवारातील अशोक गंगाधर‎ पाटील यांची कन्या रोहिणीशी नक्की केला.‎

एमएस्सी शिक्षण पूर्ण केलेल्या राेहिणी व‎ राकेश यांना ३ रोजी हळद लागणार हाेती. तर‎ ४ रोजी १०.३० वाजता त्यांचा लग्न सोहळा‎ पार पडणार हाेता.

लग्न दोन दिवसांवर‎ असताना सरलाबाई यांच्या आजाराने डाेके वर‎ काढले. त्यामुळे त्यांना अमळनेर येथील डॉ.‎ बहुगुणे यांच्याकडे उपचारार्थ दाखल केले.‎ नातेवाईकांनी डॉक्टरांना त्यांच्या मुलाच्या‎ लग्नाची कल्पना दिली होती. तर डॉक्टरांनी ही‎ शर्थीचे प्रयत्न सुरूच ठेवले. ३ रोजी देवांना‎ नारळ अर्पण करून हळद लावण्यापूर्वी वर‎ मुलगा राकेश व नववधू रोहिणी यांनी‎ रुग्णालयात जाऊन सरलाबाई यांचे आशीर्वाद‎ घेतले.

सरलाबाईंनी नववधू व वर मुलाला‎ जोडीने पाहून प्रसन्न होत आशीर्वाद दिला.‎ तसेच बेटा, नाराज राहू नको, मी लवकर उठून‎ उभी राहिल, काळजी करू नको, असे‎ सांगितले. तर सून रोहिणीला अष्टपुत्र‎ सौभाग्यवती म्हणून दोन्हींच्या पाठीवरून हात‎ फिरवत सुन व मुलाचा मुका घेतला. हळदीला‎ उशीर होईल म्हणून लवकर जा, असे सांगून‎ रुग्णालयातूनच त्यांना विदा केले. तर‎ डॉक्टरांनी ही सरलाबाईंना प्रसन्न पाहून‎ सुटकेचा निश्वास सोडला.‎

व्हिडिओ काॅलवर हळद समारंभ‎ पाहून मातेने घेतला निराेप‎ मुलाला हळद लागत असल्याचे‎ व्हिडिओकॉलने पाहून सरलाबाईंनी पाणी‎ मागितले. हळद लागल्यानंतर सरलाबाईंनी‎ डॉक्टरांना आता माझी इच्छा पूर्ण झाली. मला‎ चिंता नाही, असे म्हणत सायंकाळी ७.१०‎ वाजता जगाचा निरोप घेतला. लागलीच‎ रुग्णालयात उपस्थित नातेवाइकांनी कुटुंबिय व‎ गावातील भावबंधांना सरलाबाईंच्या मृत्युची‎ वार्ता कळवली. मात्र, वर-वधू कडील‎ नातेवाईकांनी सरलाबाई यांच्या मृत्यूचे दुःख‎ छातीवर दगड ठेवून लग्न लावून देत‎ नवरदेवाच्या आईची इच्छा पूर्ण केली.‎

मुलाला दु:ख असह्य ...‎ ​​​​​​​

वर राकेशला लग्न झाल्यावर ही‎ घटना कळताच टाहो फोडत त्याने‎ ‘आई, तुझी इच्छा पूर्ण केली, असे‎ म्हणत अश्रुंना वाट माेकळी करुन‎ दिली. शेवटी वडील, काका व‎ नातेवाइकांनी व कपिलेश्वर‎ संस्थानचे सचिव मघन पाटील, छोटू‎ पाटील, डॉ. एल. डी. चौधरी,‎ मधुकर चौधरी यांनी राकेशला धीर‎ देत मृत सरलाबाई यांच्यावर दुपारी‎ १२.३० वाजता मूळ गावी‎ अंत्यसंस्कार करण्यात आ​​​​​​​ले.‎ यावेळी हळहळ व्यक्त झाली.‎