आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बदल:पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांनी‎ पदभार घेताच चोपड्यातील रस्ते मोकळे‎

चोपडा‎23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात कित्येक वर्षांपासून मुख्य‎ रस्त्यांवर रहदारीचा मोठी समस्या‎ निर्माण झाली आहे. या समस्येचा‎ अनेकांना त्रास सहन करावा‎ लागतो. दरम्यान, नुकतेच चोपडा‎ शहर पोलिस ठाण्यात‎ चाळीसगाव येथून बदली होऊन‎ आलेल्या पोलिस निरीक्षक के.‎ के. पाटील यांनी पदभार घेतला.‎ त्यानंतर चोपडा शहरात मुख्य‎ रस्त्यांवर मोठा बदल दिसून येत‎ आहे.‎ पाेलिस निरीक्षक पाटील यांनी‎ पदभार घेताच चोपडा शहरातील‎ काेणत्याच रस्त्यावर हातगाडी‎ दिसत नाही. चोपडा शहरातील‎ मुख्य रस्त्यावर हातगाडी‎ धारकांनी जे अतिक्रमण केले‎ होते, त्यावर आतापर्यंत कुणीही ‎ ‎बोलायला तयार नव्हते.

मात्र, तीन दिवसापासून चोपडा शहरातील‎ मुख्य रस्त्यावर मोठा बदल दिसत आहे. चोपडा शहरातील व ‎ तालुक्यातील जनतेने पायी‎ चालताना हा अनुभव जाणवला‎ आहे. पोलिस निरीक्षक के. के.‎ पाटील यांनी दोन दिवसापूर्वी‎ चोपडा शहर पोलिस ठाण्यात सर्व‎ हात गाडीधारकांची, लहान-मोठे‎ व्यावसायिकांची बैठक बोलून‎ त्यांना रस्त्यावर वाहने न लावणे‎ संदर्भात स्पष्टपणे ताकीद दिली‎ आहे. यामुळे रत्नावती नदीवरील‎ दोन्ही पूल आणि छत्रपती शिवाजी‎ महाराज चौक, मेन रोड, बाजार‎ पेठ, हॉटेल सुयोगकडे जाणाऱ्या‎ रस्त्यावर बदल झाला आहे.

जेथे‎ दुचाकी चालवताना कसरत‎ करावी लागत होती, तेथे आता‎ चारचाकी गाडी सहज फिरू‎ शकते, असे रस्ते मोकळे झालेले आहेत. दोन दिवसांपासून मुख्य‎ रस्त्यावर कुठेही हात गाडी न‎ दिसल्याने चोपडा शहराने‎ मोकळा श्वास घेतल्याची भावना‎ सामान्यांनी व्यक्त केली आहे.‎ याबद्दल के. के. पाटील यांनी‎ अनेकांनी कौतुक केले आहे. ही‎ कारवाई कायमस्वरूपी व्हावी,‎ अशी मागणी केली जात आहे.‎

बातम्या आणखी आहेत...