आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेथील पंकज कला व विज्ञान महाविद्यालयात ३ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाचे प्राचार्य आर.आर. अत्तरदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर प्रमुख मार्गदर्शक प्रा.दिलीप गिऱ्हे होते. सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती देताना, समाजातील स्त्रियांच्या समस्या सोडवण्यासाठी तरुणींनी अग्रेसर राहणे काळाची गरज आहे. तसेच स्त्रीयांना सन्मान मिळावा, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे, यासाठी सवित्रीबाईंनी आपले आयुष्य खर्च केले.
शिक्षणाची दारे त्यांनी महिलांसाठी खुली केली. महिला सुधारणेसाठी आहोरात्र काम केले. त्यांच्या विचाराचे अवलोकन करावे असे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.आर.आर.अत्तरदे यांनी सावित्रीबाई फुले यांचा कार्याचा आढावा घेतला. स्त्रियांनी शिक्षण घेवून सक्षम व्हावे ही काळाची गरज आहे. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, असाही उल्लेख त्यांनी यावेळी केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक प्रा.डॉ.नंदिनी वाघ यांनी केले. आभार प्रा.सुनील सुरवाडे यांनी मानले. सर्व प्राध्यापक हजर होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.