आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोरदार घोषणाबाजी:चाळीसगावला काँग्रेसतर्फे केंद्रासह‎ राज्य सरकारची प्रतीकात्मक होळी‎

चाळीसगाव‎19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस व महिला काँग्रेसतर्फे महागाई, भ्रष्टाचार‎ यासह केंद्र व राज्य सरकार यांची प्रतीकात्मक होळी‎ दहन करण्यात आली. यावेळी दाेन्ही सरकारांविरुद्ध‎ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.‎ याप्रसंगी माजी आमदार ईश्वर जाधव, शहर‎ महिला शहराध्यक्ष अर्चना पोळ यांनी हे सरकार‎ जनतेला कसे फसवत आहे ते सांगितले. घरगुती‎ गॅस, पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तूंचे भाव‎ प्रचंड प्रमाणात वाढत आहे, शेतकऱ्याच्या कपाशी,‎ कांदा व भाजीपाला या मालाला भाव नाही, शेतकरी‎ मेटाकुटीस आला आहे पण सरकार बेमालूमपणे‎ महागाई वाढवत आहे, याबाबत उपस्थितांना‎ सविस्तर मार्गदर्शन केले. आगामी काळात या दाेन्ही‎ सरकारांनी महागाई व भ्रष्टाचार मुक्त प्रशासन‎ चालवावे, तसे न केल्यास काँग्रेस पक्ष तीव्र स्वरूपाचे‎ आंदोलन छेडेल, असे जाहीर केले.‎

यावेळी अशोक खलाणे, रमेश शिंपी, प्रदीप‎ देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी शहर‎ काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवेंद्रसिंग पाटील, रवींद्र‎ पोळ, सुधाकर कुमावत, आर.जी. पाटील, पक्ष‎ पदाधिकारी रवींद्र पाटील, बापू चौधरी, नितीन‎ परदेशी, गया शेख, सलीम शहा, योगेश चव्हाण,‎ प्रज्ज्वल जाधव, नितीन पवार, मोहम्मद दानिश,‎ सागर नागणे, सुनील पाटील, सलीम शहा, लता‎ वाणी, अनिता सूर्यवंशी, मधु गवळी, मनोज चव्हाण,‎ जितेंद्र भोसले, सुनील पाटील, भिकन खाटीक यासह‎ असंख्य महिला पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते‎ उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...