आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज भरणाऱ्या‎ पालकांची मोठी संख्या:आरटीई प्रवेशासाठी‎ तांत्रिक अडचणी,‎ मुदतवाढीची शक्यता‎

जळगाव‎13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत‎ (आरटीई) २५ टक्के राखीव‎ जागांवरील प्रवेश प्रक्रिया मोठ्या‎ प्रतिक्षेनंतर सुरु झाली आहे; मात्र‎ ऑनलाइन अर्ज दाखल करतांना‎ विविध तांत्रीक अडचणींचा सामना‎ करावा लागत आहे. आतापर्यंत‎ जळगाव जिल्ह्यातील २८२‎ शाळांसाठी ४७७६ अर्ज दाखल‎ झाले आहेत. अर्ज भरणाऱ्या‎ पालकांची संख्या मोठी असून साईट‎ हँग होत असल्याने अडचणी येत‎ आहे. दरम्यान, तांत्रिक‎ अडचणीमुळे मुदतवाढीची शक्यता‎ वर्तवली जात आहे.‎ आरटीई प्रवेशप्रक्रियेत आर्थिक‎ दुर्बल आणि वंचित घटकांमधील‎ मुलांना खासगी शाळांतील २५ टक्के‎ राखीव जागांवर मोफत प्रवेश दिला‎ जातो. त्यानुसार यंदाच्या आरटीई‎ प्रवेशप्रक्रियेत जिल्ह्यातील २८२‎ शाळांनी नोंदणी केली आहे. यात‎ ३१२२ जागा उपलब्ध आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...