आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायकल यात्रा:जीवन जगताना आपली बलस्थाने‎ ओळखून त्यावर लक्ष केंद्रित करावे‎

पाराेळा‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

केवळ गुण मिळवण्यासाठी शिक्षण‎ घेऊ नका, नकला करणारे मुळीच‎ होऊ नका, आपण कोण आहोत, हे‎ ओळखा. आपली बलस्थाने कोणती‎ आहेत, ते समजून घ्या. जे कमी आहे,‎ ते आयुष्यातून वजा करा आणि‎ आपली बलस्थाने जी असतील,‎ त्यावर लक्ष केंद्रित करा. तसेच‎ आजकाल युवकांमध्ये दिवसेंदिवस‎ मोबाइलचे व्यसन वाढत आहे. शरीर‎ स्वास्थ्यासाठी विद्यार्थ्यांनी आधी‎ मैदानावर शरीर कमवावे आणि वर्ग‎ खोल्यांमध्ये जाऊन ज्ञान ग्रहण करावे,‎ असा सल्ला अब्दुल भाई यांनी‎ विद्यार्थ्यांना दिला.‎ जळगाव येथील गांधी रिसर्च सेंटरची‎ ग्राम-संवाद सायकल यात्रा ३०‎ जानेवारीपासून जळगाव जिल्ह्याच्या‎ भ्रमंतीवर निघालेली आहे. या‎ सायकल यात्रेचा तिसऱ्या दिवसाचा‎ मुक्काम पाराेळा येथील किसान‎ महाविद्यालयात होता.

या वेळी ग्राम‎ संवाद यात्रेतील ७८ वर्षीय अब्दुल भाई‎ यांनी किसान महाविद्यालयातील‎ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गिरीष‎ कुलकर्णी यांच्या नेतृत्वात ही सायकल‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ यात्रा पारोळा शहरांमध्ये भ्रमण करत‎ आहे. या वेळी त्यांनी एनइएस‎ हायस्कूलमधील विद्यार्थ्यांशी ही संवाद‎ साधला. तसेच आझाद चौकात‎ सायंकाळी त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम‎ सादर केला. किसान महाविद्यालयाचे‎ प्राचार्य डॉ. वाय. व्ही. पाटील आणि‎ उपप्राचार्य डॉ. जी. एच. सोनवणे यांनी‎ या ग्राम-संवाद यात्रेचे स्वागत केले.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ रासेयोचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रदीप‎ औजेकर, डॉ. अनिता मुडावदकर, प्रा.‎ के. एस. गायकवाड, प्रा. शिरीष‎ सूर्यवंशी, कर्मचारी अरुण पाटील,‎ अक्षय निकम यांनी या सायकल‎ यात्रेतील सहभागी असलेल्या‎ सदस्यांचे स्वागत केले. किसान विद्या‎ प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश‎ पाटील यांनी यात्रेस शुभेच्छा दिल्या.‎

१३ दिवसात ३५० किलाेमीटरचा करणार प्रवास‎ ग्राम संवाद यात्रेत अर्जेंटीनाहून आलेल्या मारिया, ९ वर्षाचा नीर झाला व ७८‎ वर्षीय अब्दुल भाई यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे‎ ग्राम संवाद सायकल यात्रेचे आयोजन केले आहे. जळगाव येथून ३० यात्री ३०‎ जानेवारीपासून सायकलद्वारे भ्रमंतीला निघाले अाहेत. ही या यात्रा १३ दिवसात‎ ३५० किलोमीटरचा प्रवास करून २६ गावांना भेटी देणार आहेत.‎

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत‎ गांधीजींचे मोठे योगदान असून गांधींच्या‎ विचारांनी या देशाला स्वातंत्र्य मिळाले.‎ बाहेरून आलेले लोक आपल्या देशात‎ गांधीजींचा विचारांचा प्रचार-प्रसार‎ करतात. त्यांना गांधी समजले, परंतु‎ आपल्याला समजायला आजही वेळ‎ लागत असल्याची खंत माजी मंत्री डॉ.‎ सतीश पाटील यांनी गांधी ग्राम संवाद‎ सायकल यात्रेनिमित्त तामसवाडी येथे‎ आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. या‎ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच‎ हिरामण पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.‎ सतीश पाटील, प्राचार्य ए. के. चव्हाण,‎ ज्येष्ठ गांधी विचारवंत अब्दुल भाई, नीर‎ झाला, अमेरिकेतील मारिया, यात्रेचे‎ समन्वयक गिरीश कुलकर्णी, डॉ. अश्विनी‎ झाला, संदीप पवार, अजय पाटील व‎ विद्यार्थी हजर होते. हिरामण पवार यांनी‎ जीवनात यशस्वी होण्यासाठी गांधींच्या‎ विचारांचा स्वीकार करावा, असे अावाहन‎ केले. सूत्रसंचालन सी. डी. पाटील तर‎ संदीप पवार यांनी आभार मानले.‎

बातम्या आणखी आहेत...