आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालव्ह जिहाद व धर्मांतरणविरोधी कायदा करावा या मागणीसाठी शहरातून रविवारी सकाळी हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या प्रकरणी आयोजकांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दाखल झालेल्या तक्रारीनुसार संजय रामेश्वर शर्मा व इतरांनी विनापरवानगी मोर्चा काढला. मोर्चात सुमारे ४ ते ५ हजार नागरिकांना सहभाग होता. त्यामुळे मुंबई पोलिस कायदा कलम १९५१ चे कलम ३७ (१)(३) चे उल्लंघन झाले. तसेच जमाव बंदी आदेश मोडल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान, शहरातून काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने महिला व युवक, युवती सहभागी झाले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.