आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्णय‎:करवाढीच्या विरोधात जनहित‎ याचिका दाखल केली जाणार‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या ‎गावातील मालमत्ताधारकांचा कर‎ नियमबाह्य व बेकायदेशीर पद्धतीने वाढवला ‎आहे. त्यामुळे या निर्णया विरोधात उच्च ‎ ‎ न्यायालयात जनहित याचिका दाखल ‎करण्याचा निर्णय मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ‎नागरिकांनी स्थापन केलेल्या संघर्ष‎ समितीच्या बैठकीत घेण्यात आला.‎ शहरातील वलवाडी भागातील‎ शिवसागर मंगल कार्यालयात ही बैठक‎ झाली. या वेळी वाढीव मालमत्ता करावर‎ चर्चा झाली. मनपाने नियमबाह्य व‎ बेकायदेशीर करवाढ केली असल्याचा‎ आरोप बैठकीत करण्यात आला. करवाढ‎ रद्द करावी, या मागणीसाठी महापालिकेला‎ निवेदन देण्यात आले होते.

पण काहीही‎ उपयोग झाला नाही. करवाढ नियमानुसार‎ असून, कर भरावा अशी भूमिका मनपा‎ प्रशासनाने घेतली आहे. पण हद्दवाढीच्या‎ भागात राहणाऱ्या नागरिकांनी ३१ मार्चपर्यंत‎ १ रुपयाही कर भरू नये असे आवाहन‎ बैठकीत करण्यात आले. तसेच‎ मनपाविरोधात उच्च न्यायालयात जनहित‎ याचिका दाखल करण्याचा ठराव करण्यात‎ आला. मनपाने केलेल्या बेेकायदेशीर‎ करवाढी विरोधात लढा देण्यासाठी संघर्ष‎ समितीची स्थापन करण्यात आली.‎

समितीत बी. बी. मासुळे, नाना रायते, एम.‎ वाय. पाटील, अशोक गिरी, आबासाहेब‎ पाटील, अॅड. राजन वाघ, सुभाष मासुळे,‎ उमेश गांगुर्डे, पी. सी. पाटील, नाना‎ साळुंखे, विजय गुरव, आनंदा पाटील, नाना‎ पाटील यांचा समावेश करण्यात आला.‎ बैठकीला आबा पाटील, रणजित भोसले,‎ अरुण धुमाळ, मुकेश खरात, राजेंद्र‎ चौधरी, आबा मराठे, दीपक देसले,‎ जगदीश चव्हाण, स्वप्नील भामरे, प्रवीण‎ साळवे, सुमीत काळे, जितेंद्र पाटील, मयूर‎ देवरे, वाल्मीक वाघ, बापूजी वाघ,‎ शशिकांत पाटील, एस. आर. महाजन, बी.‎ डी. पाटील, उत्तम पाटील, विक्की देवरे,‎ महेंद्र पाटील, कल्पेश चव्हाण आदी‎ उपस्थित होते. महापालिकेच्या हद्दीत‎ असलेल्या गावातील नागरिकांना‎ महापालिकेने आधी मूलभूत सुविधा‎ पुराव्यात, अशी मागणी करण्यात आली. या‎ वेळी हद्दवाढीच्या भागातील समस्यांवर‎ चर्चा झाली.‎

बातम्या आणखी आहेत...