आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हलगर्जीपणा:वादळानंतर एक आठवडा उलटला तरी‎ नुकसानीच्या पंचनाम्याची प्रतीक्षा कायम‎

कापडणे‎8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कापडणेसह परिसरात एक आठवड्यापूर्वी‎ वादळी वाऱ्यामुळे पिकांचे मोठे नुकसान‎ झाले. पण अद्यापही या भागात महसूल‎ विभागाचे कर्मचारी पंचनामे करण्यासाठी‎ आलेले नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी‎ केला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी‎ याविषयाकडे लक्ष द्यावे. तसेच‎ नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे‎ करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली‎ आहे.‎ कापडणेसह परिसरात ६ मार्चला‎ सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वादळी‎ वारा होता. त्यामुळे मका, गहू, शेवग्याची‎ बाग आदी पिकांचे नुकसान झाले.‎ वाऱ्यामुळे गहू, मका आडवा झाला तर‎ शेवगा शेंगाची झाडे उन्मळून पडली. या‎ घटनेला आता एक आठवडा उलटला तरी‎ अद्यापही महसूल विभागाचे अधिकारी,‎ कर्मचारी पंचनामे करण्यासाठी बांधावर‎ आलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये‎ नाराजी आहे.

वादळी वाऱ्यामुळे‎ शांताराम पंढरीनाथ पाटील, शिवाजी टिपू‎ पाटील, बेबीबाई लोटन पाटील आदींसह‎ अनेक शेतकऱ्यांच्या मक्याचे नुकसान‎ झाले आहे. शांताराम पाटील यांनी‎ साडेतीन महिने काबाडकष्ट करून‎ पिकवलेला दोन एकर क्षेत्रातील मका‎ उन्मळून पडला आहे. त्यामुळे त्यांचे‎ अंदाजे एक लाखा पेक्षा जास्त नुकसान‎ झाले आहे. आता मक्यातील दाणे खराब‎ होण्याची शक्यता आहे. तसेच चाराही‎ खराब झाला आहे. त्यामुळे तातडीने‎ पंचनामे करावे, अशी मागणी‎ शेतकऱ्यांनी केली आहे. वरिष्ठ‎ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.‎

विलंबाची विचारणा करू‎
तालुक्यात ज्या ठिकाणी जास्त‎ नुकसान झाले आहे. त्याठिकाणी कृषी‎ सहायक व तलाठी आधी पंचनामे‎ करत आहे. इतर तालुक्यांपेक्षा धुळे‎ तालुक्यात नुकसान कमी आहे.‎ कापडणे परिसरात पंचनामे का झाले‎ नाहीत याबाबत संबंधित कृषी‎ सहायकांना विचारण केली जाईल.‎ - वाल्मीक प्रकाश, तालुका कृषी‎ अधिकारी, धुळे‎
त्वरित पंचनामे करा‎
याविषयी शेतकरी शांताराम‎ पाटील यांनी सांगितले की,‎ वादळी वाऱ्याला एक‎ आठवडा उलटला तरी‎ अद्याप पंचनामा झाला नाही.‎ मका शेतात आडवा पडला‎ आहे. महसूल विभागाने‎ तातडीने पंचनामे करण्याची‎ आवश्यकता असल्याचे ते‎ म्हणाले.‎

हातातांेडाशी‎ आलेला घास गेला‎
यंदा मुबलक पाऊस झाला. त्यामुळे रब्बी हंगामातील मका लागवडीचा फायदा होईल, असे वाटत‎ होते. पण वादळी वाऱ्यामुळे नुकसान झाले. हवामान विभागाने पुन्हा अवकाळी पावसाची शक्यता‎ वर्तवली आहे. तसे झाल्यास हाती काहीच येणार नाही. - राजेंद्र काशिनाथ माळी, शेतकरी‎

बातम्या आणखी आहेत...