आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सल्ला:वृद्धत्वाला सकारात्मकतेची जोड द्या

शिरपूर‎12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ नागरिकांनी वृद्धत्व‎ कंटाळवाणे वाटू नये यासाठी त्याला‎ सकारात्मकतेची जोड द्यावी, असे‎ मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष‎ डॉ. तुषार रंधे यांनी व्यक्त केले.‎ येथील किसान विद्या प्रसारक‎ संस्थेतून निवृत्त झालेल्या‎ कर्मचाऱ्यांचा नुकताच मेळावा‎ झाला. त्या वेळी ते बोलत होते. या‎ वेळी संस्थेचे सचिव निशांत रंधे,‎ विश्वस्त रोहित रंधे, प्राचार्य डॉ.‎ एस. एन. पटेल, विनायक देवरे,‎ सुभाष कुलकर्णी, संस्थेचे विश्वस्त‎ श्याम पाटील, संजय गुजर,‎ व्यवस्थापक आनंद पाटील, के. डी.‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ बच्छाव, सीताराम माळी, भय्या‎ माळी, एम. के. भामरे, सुभाष अहिरे‎ आदी उपस्थित होते. डॉ. तुषार रंधे‎ म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांनी‎ जीवनाचा मनमुराद आस्वाद घ्यावा.‎ तसेच संस्थेशी असलेला ऋणानुबंध‎ जपून ठेवत संस्थेला मार्गदर्शन‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ करावे.

ज्येष्ठांनी सामूहिक पर्यटन‎ करावे. ज्येष्ठांसाठी संस्थेतर्फे‎ सुसज्ज असा सभागृह, आरोग्य‎ सुविधा पुरवण्यात येतील, असेही ते‎ म्हणाले. निशांत रंधे यांनी मनोगत‎ व्यक्त केले. डॉ. मनोज निकम‎ यांनी ज्येष्ठांचे आरोग्य या विषयावर‎ मार्गदर्शन केले. प्रा. माळी, प्रा. डॉ.‎ लता गुजराथी, जी. ओ. पाटील‎ यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.‎ योगिता पाटील यांनी तुन्हं मन्हं तोंड‎ शे हा अहिराणी कार्यक्रम केला.‎ कार्यक्रमात प्राचार्य डॉ. एस. एन.‎ पटेल, प्राचार्य एस. एस. राजपूत‎ यांच्यासह ७५ वर्षे पूर्ण झालेल्या १५‎ सेवानिवृत्तांचा सत्कार झाला. सुरेश‎ बोरसे यांनी सूत्रसंचालन केले. पी.‎ डी. माळी यांनी आभार मानले.‎ कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्य‎ डॉ. एस. एन. पटेल, कार्याध्यक्ष प्रा.‎ वाय. डी. बेडिस्कर, सचिव शालिक‎ तिरमले आदींनी प्रयत्न केले. निवृत्त‎ कर्मचाऱ्यांनी संघटित राहावे, या‎ उद्देशाने हा उपक्रम झाला.‎

बातम्या आणखी आहेत...