आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:25 % राखीव प्रवेश ; पहिल्या दिवशी 9 अर्ज‎

धुळे‎25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्या‎ अंतर्गत २५ टक्के प्रवेशाची असलेली‎ प्रतिक्षा आता संपली आहे. १ मार्चपासून‎ विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली‎ आहे. १७ मार्च पर्यंत विद्यार्थ्यांची नोंदणी‎ करता येणार आहे. यावर्षी देखील‎ राज्यस्तरावरुन एकच सोडत जाहीर‎ होणार आहे, अशी माहिती‎ शिक्षणाधिकारी राकेश साळुंखे यांनी‎ दिली आहे.‎ मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क‎ कायद्या अंतर्गत खासगी विनाअनुदानीत‎ शाळांमध्ये राखीव असलेल्या २५ टक्के‎ प्रवेशासाठी गेल्या काही दिवसा पासुन‎ पालकांना प्रतिक्षा लागुन होती.ही प्रतिक्षा‎ संपली आहे.

१ ते १७ मार्चपर्यंत पालकांना‎ आरटीई पोर्टलवर ऑनलाइन अर्जाची‎ मुदत आहे. यंदा प्रवेशासाठी‎ राज्यस्तरावरून एकच सोडत जाहीर‎ होईल. सोडतीनंतर प्रत्यक्ष प्रवेशासाठी‎ एक नियमित फेरी राबवली जाईल. या‎ फेरीमध्ये संधी मिळू न शकलेल्या‎ विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी टप्प्याटप्प्याने‎ प्रतीक्षा यादीनुसार चार फेऱ्या राबवल्या‎ जाणार आहेत.प्रवेश अर्ज करताना‎ पालकांना दहा शाळांची निवड करता‎ येणार आहे. एकापेक्षा जास्त अर्ज‎ भरल्यास एकही अर्ज लॉटरीसाठी ग्राह्य‎ धरला जाणार नाही.जिल्ह्यातील ९३‎ शाळांमध्ये यंदा २५ टक्के अंतर्गत १ हजार‎ ६ जागांवर विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिले‎ जाणार आहे.‎

प्रवेशासाठी हे अनिवार्य : वंचित गटातील मुलांच्या प्रवेशाकरिता वार्षिक कमाल उत्पन्नाची‎ मर्यादा लागू नाही. तर एक लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या पालकांच्या मुलांचा आर्थिक दुर्बल‎ गटामध्ये समावेश होतो. प्रवेशाकरिता १० शाळांची निवड करावी. अर्ज भरताना शाळेपासून ते‎ घरापर्यंतचे हवाई अंतर हे गुगल मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब‎ लक्षात घेऊन पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता तो बलून जास्तीत‎ जास्त ५ वेळाच निश्चित करता येईल, याची नोंद घ्यावी, असे आवाहन केले आहे.‎

प्रवेशासाठी हे कागदपत्रे आवश्यक‎
निवासी पुराव्याकरिता रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायन्सस, वीज‎ देयक, टेलिफोन, प्रॉपर्टी टॅक्स, घरपट्टी, आधारकार्ड, मतदान‎ ओळखपत्र, पासपोर्ट, राष्ट्रीयकृत बँकेच पासबूक यापैकी एक‎ पुरावा ग्राह्य धरण्यात येईल. स्वत:च्या मालकीचे घर नसल्यास‎ दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणी असलेला भाडेकरार ग्राह्य‎ धरण्यात येईल. जन्मदाखला, जातीचा दाखला, उत्पन्न‎ दाखला, दिव्यांग मुलासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र, आधारकार्ड‎ यांसह इतर आवश्यक कागदपत्रे अनिवार्य असतील.‎

बातम्या आणखी आहेत...