आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवजयंतीनिमित्त सर्वधर्म संघातर्फे कार्यक्रम‎:छत्रपती शिवाजी महाराजांनी न्यायाचे‎ राज्य करत सामान्यांना दिला न्याय‎

धुळे‎18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

छत्रपती शिवाजी महाराज यांनी‎ सर्वधर्मीयांना समान वागणूक देत‎ माणसाला माणूस म्हणून वागवले.‎ त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी‎ स्वराज्यात सुराज्य होते. नागरिकांना‎ केंद्रबिंदू मानून कामकाज होत होते.‎ छत्रपती शिवाजी महाराज यांनी‎ अबलेच्या शीलाचे रक्षण केले.‎ शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक‎ केल्याचे मत गंगामाई कला‎ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.‎ आर. पाटील यांनी व्यक्त केले.‎

शिवजयंतीनिमित्त येथील सेंट‎ अॅन्स कथोलिक चर्चच्या सभागृहात‎ सर्वधर्म संघातर्फे कार्यक्रम झाला.‎ त्या वेळी छत्रपती शिवरायांचे हिंदवी‎ स्वराज्य आणि संवैधानिक भारतीय‎ प्रजासत्ताक या विषयावर ते बोलत‎ होते. डाॅ. विजयचंद्र जाधव‎ अध्यक्षस्थानी होते. नरेंद्र‎ वडगावकर, ॲड. विनोद बोरसे, डाॅ.‎ शरद वाणी, एल. आर. राव,‎ ज्योत्स्ना खैरनार, हाजी अब्दुल‎ करीम न्हावकर, मुरलीधर पांडे,‎ जयश्री शहा, ॲड. आसिफ शेख,‎ दत्तात्रय कल्याणकर, शंकर पवार,‎ श्रीकृष्ण बेडसे, प्रकाश भंडारी आदी‎ उपस्थित हाेते. प्राचार्य डॉ. एस.‎ आर. पाटील म्हणाले की, छत्रपती‎ शिवाजी महाराज गनिमी काव्याचे‎ जनक होते.

त्यांनी बलाढ्य मोगल‎ सैन्याचा मुकाबला करण्यासाठी‎ अठरापगड जातीच्या मावळ्यांना‎ सोबत घेऊन परिस्थितीनुसार‎ युद्धनीतीचा अवलंब केल्याचे ते‎ म्हणाले. डाॅ. विजयचंद्र जाधव‎ म्हणाले की, छत्रपती शिवाजी‎ महाराज सतराव्या शतकात झालेला‎ एक चमत्कार होता. त्यांनी‎ स्वराज्यात संवैधानिक व्यवस्था‎ राबवल्याचे ते म्हणाले. छत्रपती‎ शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे‎ प्रत्येकाने वाचन करावे. त्याचबरोबर‎ त्यांच्या विचारातून प्रेरणा घ्यावी,‎ असेही ते म्हणाले. ॲड. एम. एस.‎ पाटील यांनी प्रास्ताविक केले. शेख‎ हुसेन गुरुजी यांनी सूत्रसंचालन‎ केले. प्रा. राम जाधव यांनी आभार‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...