आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहापालिकेतर्फे स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येते आहे. या अभियानांतर्गत स्वच्छ वाॅर्ड स्पर्धा घेण्यात येते आहे. स्पर्धेत प्रत्येक प्रभागातील स्वच्छ हॉटेल, हॉस्पिटल, शाळा, मार्केट, वसाहतीला बक्षीस देण्यात येईल. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहरात स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते आहे. आेला व सुका कचरा वेगळा जमा करण्याचा प्रयत्न होताे आहे.
तसेच काही वसाहतीत घरस्तरावरच कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते आहे. तसेच प्रत्येक प्रभागातील स्वच्छ हाॅटेल, हॉस्पिटल, शाळा, वसाहत, मार्केटला बक्षीस देण्यात येणार आहे. त्यासाठी स्वच्छ वाॅर्ड स्पर्धा घेण्यात येते आहे. त्यानुसार प्रत्येक प्रभागातील स्वच्छता निरीक्षक संबंधित संस्थाची तपासणी करता आहे. गुणांनुसार प्रथम, द्वितीय, तृतीय बक्षीस दिले जाणार आहे. स्वच्छता, पाण्याची सोय, अन्नपदार्थांची गुणवत्ता, बायोमेडिकल कचरा विल्हेवाट लावण्याची सोय, इन्फ्रास्ट्रक्चर आदींची तपासणी होणार आहे. ही स्पर्धा १५० गुणांची असून जास्त गुण मिळवणाऱ्या संस्थेला बक्षीस दिले जाईल. विजेत्यांची नाव पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.