आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:अदानींच्या विरोधात काँग्रेस रस्त्यावर;‎ चौकशीसाठी समिती नेमण्याचा आग्रह‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उद्योगपती अदानी यांच्या विरोधात‎ काँग्रेसतर्फे जिल्हाधिकारी‎ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.‎ तसेच स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसह‎ एलआयसी कार्यालयासमोर आमदार‎ कुणाल पाटील यांच्या नेतृत्वाखाली‎ आंदाेलन करण्यात आले.‎ गाेरगरिबांच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या‎ अदानींविषयीच्या अहवालाची संसदीय‎ समितीतर्फे चाैकशी करावी, अशी‎ मागणी जिल्हाधिकारी जलज शर्मा‎ यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात‎ आली.‎

आंदोलनात भा.ई. नगराळे, माजी‎ खासदार बापू चाैरे, डी. एस. अहिरे,‎ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर,‎ अनिल भामरे, भगवान गर्दे, बाजीराव‎ पाटील, डाॅ. दरबारसिंग गिरासे, बाजार‎ समितीचे रितेश पाटील, महेश घुगे,‎ साबीर शेख, प्रमाेद सिसाेदे, काँग्रेस‎ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा‎ गायत्री जयस्वाल, अर्चना पाटील,‎ साेमनाथ पाटील, बापू खैरनार, आनंदा‎ पाटील, डाॅ. दत्ता परदेशी, पंढरीनाथ‎ पाटील, दिलीप शिंदे, पीतांबर महाले,‎ छाेटू चाैधरी, के. डी. पाटील, राजेंद्र‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ शिंदे, जिल्हा परिषद सदस्य अरूण‎ पाटील, साक्रीचे दीपक साळुंखे,‎ राजीव पाटील, रतीलाल पाटील, संदीप‎ पाटील, शिवाजी अहिरे, राजेंद्र खैरनार,‎ आबा शिंदे, भानुदास गांगुर्डे, दीपक‎ पाटील आदी सहभागी झाले होते.

या‎ वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या‎ विरोधात घोषणाबाजी झाली.‎ प्रशासनाला देण्यात आलेल्या‎ निवेदनात म्हटले आहे की, माेदी‎ सरकारकडून निवडक उद्याेगपतींवर‎ मेहरबानी केली जाते आहे. त्यामुळे‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ सामान्यांचा पैसा धाेक्यात आला आहे.‎ अदानी उद्याेग समुहामध्ये एलआयसी,‎ स्टेट बँक व सार्वजनिक वित्तीय‎ संस्थांना काेट्यावधी रूपये गुंतवण्यास‎ केंद्र सरकारने भाग पाडले. त्यामुळे‎ एलआरसी, स्टेट बँकेत सर्वसामान्य‎ खातेदारांनी गुंतवलेल्या पैसा परत‎ मिळेल का याबाबत भीती निर्माण झाली‎ आहे. चुकीच्या निर्णयामुळे विमाधारक‎ व गुंतवणूकदाराचे ३३ हजार काेटी‎ रूपयांचे नुकसान झाले आहे. काँग्रेस‎ उद्याेगपतींच्या विराेधात नाही.

पण‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎‎ साामन्य जनतेसोबत आहे. त्यामुळे‎ अदानी समुहातील आर्थिक‎ गैरकारभाराचा पर्दाफाश करणाऱ्या‎ हिडनबर्ग संस्थेच्या अहवालाची‎ संयुक्त संसदीय समिती किंवा सर्वाेच्च‎ न्यायालयातील मुख्य न्यायाधिशामार्फेत‎ चाैकशी करण्यात यावी, याविषयावर‎ संसदेत चर्चा करावी, गुंतवणूकदारांच्या‎ पैशाला संरक्षण देण्याचा निर्णय घ्यावा‎ अशी मागणी केली. जिल्हाधिकारी‎ जलज शर्मा यांच्याशी आमदार कुणाल‎ पाटील यांनी चर्चा केली.‎

संसदेत चर्चा व्हावी‎
केंद्र सरकारच्या दबावामुळे‎ एलआयसी, स्टेट बँकेने अदानी‎ ग्रुपमध्ये गुंतवणूक केली.मात्र, हा‎ सर्वसामान्यांचा पैसा आहे.त्यांना पैसा‎ परत मिळाला पाहिजे.अदानी ग्रुपच्या‎ चाैकशीसाठी स्वतंत्र समिमी नेमावी.‎ याविषयावरसंसदे त चर्चा करावी.‎ अन्यथा काँग्रेस आंदाेलन करेल.‎ -कुणाल पाटील,आमदार.‎

फलकांनी वेधले लक्ष
माेर्चा जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयावर आल्यानंतर त्याठिकाणी हमारा चाैकीदार चाेर है‎ अशा प्रकारच्या घाेषणा देत पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा निषेध करण्यात आला. तसेच आंदाेलनात सहभागी झालेल्यांनी हातात‎ विविध फलक घेतले होते. त्यात भंवर ने खिलाया फुल,फुल काे ले गया हिडनबर्ग,२-जी का बडा घाटाेला है अदानी जी,ना‎ खाऊंगा ना खाने देऊंगा,मगर अदानी काे पुरा देश लुटने दुंगा आदी फलकांचा समावेश होता.‎

बातम्या आणखी आहेत...