आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने आत्महत्या केली. धुळे तालुक्यातील मेहेरगाव येथे ही घटना घडली. भटू भामरे असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मेहेरगाव येथील भटू हिलाल भामरे (वय ५५) यांनी शेतीसाठी कर्ज घेतले होते.
पण त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळाले नाही. कर्जाचे हप्ते वेळेवर भरले जात नसल्याने ते व्यथित होते. याच चिंतेतून त्यांनी शेतात गळफास घेतला. त्यांचे भाऊ सुरेश हिलाल भामरे शेतात आल्यावर हा प्रकार उघडीस आला. उपचार सुरू करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सुरेश भामरे यांच्या माहितीवरून साेनगीर पोलिस ठाण्यात नोंद झाली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.