आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्याच्या वातावरणात सातत्याने बदल घडत आहेत. मागील आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू होता. त्यानंतर अवघ्या चारच दिवसांत तपमानात प्रचंड वाढ होऊन पारा ४० च्या पार जाऊन ४२ अंशांवर गेला आहे. यामुळे मे हीटचा तडाखा जाणवण्यास सुरुवात झाली आहे.
बुधवारी तर सकाळी १० वाजे पासूनच चटके जाणवत होते. म्हणून उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी कामा शिवाय बाहेर पडू नका, असा सल्ला आरोग्य विभागाकडून नागरिकांना देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या वातावरणात मार्च महिन्यापासून दोलायमान स्थिती आहे. बेमोसमी पावसामुळे जिल्ह्यातील वातावरण सातत्याने बदलत राहिले.
मार्च व एप्रिल महिन्यात ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे ऐन उन्हाळ्यात पावसाळ्या सारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे तापमान ३० अंशांपर्यंत खाली आले होते. हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी १० ते १६ मे दरम्यान हवामान कोरडे राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
त्रास झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उन्हाळ्यात मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेये टाळावीत, उच्च प्रथिनयुक्त आहार आणि शिळे अन्न खाऊ नये. त्रास होत असल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. -डॉ. नंदकिशोर पिंपळीस्कर,फॅमिली फिजिशियन
उन्हाळ्यात काय करावे
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.