आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणी वितरणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे तापी योजनेच्या सुकवद व बाभळे येथील केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला तर वीज कंपनीने तातडीने पर्यायी उपाययोजना करावी, वीज पुरवठा खंडित होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना महापौर प्रतिभा चौधरी यांनी केली.
पाणीपुरवठा योजनांचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने मनपात मंगळवारी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी उपमहापौर नागसेन बोरसे, आयुक्त देविदास टेकाळे, स्थायी समिती सभापती किरण कुलेवार आदी उपस्थित होते. तापी योजनेच्या सुकवद, बाभळे येथील पंपिंग स्टेशनचा वीज पुरवठा खंडित होऊ नये यासाठी उपाययोजना करावी, अशी सूचना बैठकीत झाली.
तापी योजनेला वीजपुरवठा करणाऱ्या ३३ केव्ही वीज वाहिनीवर बिघाड झाल्यास पर्यायी फीडरवरून वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचा निर्णय झाला. तसेच उपाययोजना झाल्या नाही तर पालकमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येईल, असा इशारा महापौर प्रतिभा चौधरी यांनी दिला.
तसेच वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या वृक्षांच्या फांद्यांची छाटणी करताना वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी महापालिकेला कळवावे. पाणी वितरणावेळी विद्युत पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना झाली. बैठकीला वीज कंपनीचे कार्यकारी अभियंता आर. एम. पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता डी. डी. साळुंखे, उपायुक्त विजय सनेर, अभियंता कैलास शिंदे, विद्युत अभियंता एन. के. बागूल, कनिष्ठ अभियंता प्रदीप चव्हाण उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.