आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील मेहेरगाव येथील शेतकरी भटू भामरे यांच्या आत्महत्येची घटना ताजी असताना सोमवारी न्याहळोद गावातील तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. भरत पाटील असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. वीज कपंनीने खंडित केलेला वीज पुरवठा विनंती करूनही सुरू न केल्यामुळे भरत पाटील यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. शहरापासून जवळ असलेल्या न्याळोद येथील शेतकरी भरत रमेश पाटील (वय २६) यांची गाव शिवारात सुमारे ३ एकर शेती आहे. त्यांनी कांदा व मका लावला होता. यंदा अपेक्षेप्रमाणे उत्पन्न मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. पण १० दिवसांपूर्वी वीज कंपनीने वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे पिकांना पाणी देण्याचा प्रश्न भरत पाटील यांच्यासमोर होता. त्यांनी वीज कंपनीच्या कार्यालयात जात वीजपुरवठा सुरू करण्याची विनंती केली होती. पण अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे भरत पाटील यांनी शेतात विषारी द्रव औषध सेवन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.