आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचा पहिला टप्पा मानला जात असलेल्या बाेरविहीर ते नरडाणा या नवीन रेल्वे मार्गासाठी शंभर काेटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. यामुळे भूसंपादन लवकर हाेण्यास मदत हाेणार आहे. सद्य:स्थितीत या मार्गासाठी जमीन माेजणीची प्रक्रिया राबवली जात आहे. ती पूर्ण झाल्यानंतर भूसंपादनाच्या प्रक्रियेला सुरुवात हाेणार आहे. निधीबाबत खासदार डाॅ. सुभाष भामरे यांच्याकडूनही दुजाेरा दिला गेला आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग मंजूर झाल्यानंतर सदर कामासाठी आता निधीची प्रतीक्षा आहे. रेल्वे विभागाने या मार्गाच्या पहिल्या बोरविहीर ते नरडाणापर्यंतचे काम हाती घेतले आहे. यात जमिनीच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे.
मात्र प्रत्यक्षात काम सुरू होण्यासाठी अद्यापही मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात या ५०.६ किलोमीटर अंतराच्या कामासाठी १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे जमीन माेजणीनंतर भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने करणे शक्य हाेणार आहे. टप्प्याटप्प्याने या साठी निधी उपलब्ध हाेणार असल्याची माहिती खासदार डाॅ. भामरे यांनी दिली. तसेच यासंदर्भात त्यांनी दुजाेराही दिला आहे.
तर दुसरीकडे मनमाड-इंदूर रेल्वे मार्गाचे स्वप्न अनेक वर्षांपासून दाखवले जात आहे. त्यासाठी दहा हजार काेटी रुपयांची गरज असताना पहिल्या टप्प्यात केवळ ३६८ किलाेमीटरपैकी तीस किलाेमीटरच्या टप्प्याचे काम हाती घेतले गेले आहे. नरडाणा रेल्वेसाठीही शंभर काेटी हा तुटपुंजा निधी मंजूर केला आहे. ही थट्टाच असल्याचे संघर्ष समितीचे मनाेज मराठे यांनी म्हटले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.