आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यात होणारे बालविवाह रोखण्यासाठी शिक्षकांनी समाजात जनजागृती करणे आवश्यक आहे. आदर्श समाज घडवण्याची ताकद शिक्षकांमध्ये असल्याने त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व पुरोगामी महिला मंचतर्फे महिला दिनाचे औचित्य साधून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार झाला. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात हा कार्यक्रम झाला. जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती महावीरसिंह रावल अध्यक्षस्थानी होते. या वेळी आमदार मंजुळा गावित, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, महापौर प्रतिभा चौधरी, माजी कृषी सभापती अरविंद जाधव, माजी महापौर जयश्री अहिरराव, माजी कृषी सभापती संग्राम पाटील, शिंदखेडा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी सी. के. पाटील, साक्रीचे गटशिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, पुरोगामी शिक्षक संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्य कोषाध्यक्षा रुख्मा पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी रंजिता ढिवरे, प्रा. हेमंत पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी बुवनेश्वरी एस म्हणल्या की, समाजामध्ये शिक्षकांच्या शब्दाला मोठा मान आहे. त्यामुळे शिक्षकांनी बालविवाह थांबवण्यासाठी समाजात जागृती करावी.
बालविवाह होत असल्यास त्याची माहिती प्रशासनाला द्यावी. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन या वेळी त्यांनी दिले. आमदार मंजुळा गावित म्हणाल्या की, शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडवण्याचे काम शिक्षक करतात. महिला शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सुशिक्षित व सुसंस्कृत घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्या म्हणाल्या. प्रा. हेमंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सुनीता चौधरी व स्मिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. दीपा मोरे यांनी प्रास्ताविक केले. भारती भदाणे यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भूपेश वाघ, सरचिटणीस ऋषीकेश कापडे, कार्याध्यक्ष प्रशांत महाले, विभागीय अध्यक्ष प्रभाकर चौधरी, सचिव रवींद्र देवरे, रवींद्र सैंदाणे, बाबासाहेब बढे, कमलेश चव्हाण, न्हानू माळी, उपाध्यक्ष कैलास सोनवणे, गोकुळ पाटील, किरण चौधरी, मुरलीधर नानकर, प्रतिभा वाघ, सुरेखा बोरसे, रंजना राठोड, उपाध्यक्ष संगीता ठाकरे, वैशाली बच्छाव, तालुकाध्यक्षा सुमन साळुंके, सरचिटणीस भारती भदाणे, कार्याध्यक्ष जयश्री बोरसे, कोषाध्यक्ष प्रणिती पाटील, प्रमुख संघटक स्मिता पाटील, हनुमान दास बैरागी, दीपक कुवर, गौतम बाविस्कर, अशोक बडगुजर, सतीश आखडमल, भागवत चौधरी, मनोज परदेशी आदींनी प्रयत्न केले.
उत्कृष्ट कार्य केल्याने गौरवले
कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षिका व पदोन्नती प्राप्त मुख्याध्यापिकांचा ज्ञानज्योती पुरस्कार, केंद्रप्रमुख व शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांचा शिक्षण गौरव पुरस्कार आणि विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांचा समाजरत्न पुरस्कार देत गौरव झाला. या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस, महापौर प्रतिभा चौधरी, सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पुरोगामी रत्न पुरस्कार देण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.