आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएक गाव, एक हाेळी, इकाे फ्रेंडली हाेळी अभियान राबवण्यात यावे, अशी मागणी निसर्ग मित्र समितीने केली अाहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवण्यात अाले अाहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड करून वृक्षसंवर्धन करणे काळाची गरज असून, होळी निमित्ताने होणारी वृक्षतोड व पाण्याची नासाडी थांबवण्यासाठी एक गाव-एक होळी, इको फ्रेंडली होळी अभियान राबवून पर्यावरणाच्या राष्ट्रीय उपक्रमाला प्रोत्साहन द्यावे. तसेच हे अभियान शासनातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर एक गाव-एक होळी हा कार्यक्रम राबवण्यात यावा.
हे अभियान राबवण्यासाठी जिल्हास्तरीय संबंधित अधिकारी तसेच गावातील सरपंच,ग्रामसेवक यांना सूचना देऊन सर्व ग्रामस्थांना गाव पातळीवर अवगत करावे, आपल्या परिसरातील वृक्षांचा सांभाळ करून एक गाव-एक होळी या अभियानाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद द्यावा, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना निवेदन देताना निसर्ग मित्र समितीचे समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रेमकुमार अहिरे, राज्य महा सचिव संतोष पाटील, जिल्हाध्यक्ष डी. बी. पाटील, राज्य संघटक किशोर डियालाणी, राज्य संघटक प्रभाकर सूर्यवंशी, जिल्हा सचिव विश्वासराव पगार, धुळे शहर संघटक प्रा. चंद्रशेखर विसपुते, धुळे शहर संघटक भूषण चौधरी, प्रसिद्धी प्रमुख हर्षल महाजन आदी पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.