आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात किमान तापमानाचा पारा ८ अंशांवर स्थिरावला आहे. काही दिवसांपासून किमान तापमानात घट झाल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. कमाल तापमान मात्र ३० अंशाची नोंद केली आहे. शहरात पुन्हा किमान तापमानात घट झाली आहे. तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा १० अंशांखाली घसरून ८ अंशांवर तापमान स्थिर झाले आहे.
तापमानात दिनांक २ फेब्रुवारीपासून बदल झाला आहे. यादिवशी किमान तापमान १० अंशाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर तापमानात घट होऊन ८ अंशाची नोंद कृषी महाविद्यालयात झाली हाेती. जानेवारीच्या शेवटी तापमानात वाढ झाली होती. किमान व कमाल तापमानात वाढ झाली होती. मात्र फेब्रुवारी महिन्यात उत्तरेकडे होणाऱ्या बर्फ वृष्टीमुळे थंड वारे वाहू लागल्याने रात्रीच्या तापमानात घट झाली आहे. सायंकाळनंतर गारवा जाणवत आहे. तर दिवसा मात्र उन्हाची तीव्रता जाणवत आहे. कमाल तापमान रविवारी ३० अंशाची नाेंद केली आहे. हे तापमान काही दिवसांसाठी राहणार असून यानंतर तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.