आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासुन रात्रीचे किमान तापमानाचा पारा ७ अंशावर स्थिरावला आहे. बुधवारी देखील किमान तापामान ७.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी सकाळपासून थंड वारे वाहत असल्याने दिवसभर गारठा होता. तर थंडीची ही स्थिती आठवडाभर टिकून राहण्याचा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे. जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून रात्रीचे किमान तापमानाचा पारा १० अंशाखाली आलेला आहे. तर आता तीन दिवसांपासून सातत्याने किमान तापमानाचा पारा ७ अंशावर स्थिरावलेला आहे.
कमाल तापमानही ३० अंश सेल्सिअसखालीच नोंदवण्यात आले आहे.परंतु शहरात बुधवारी थंडीचे प्रमाण वाढलेले जाणवत आहे. बुधवारी कृषी महाविद्यालयात किमान तापमान ७.६ व कमाल तापमान २७ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली आहे. उत्तर व ईशान्यकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे शहरात थंडी वाढली आहे. बुधवारी सकाळपासूनच शहरात थंड वारे दिवसभर वाहत होते.
सोमवारी, मंगळवारी अधिक थंडी
शहरातील वातावरणात फरक झालेला आहे. तापमानाचा पारा ७ अंशावर स्थिरावला आहे. उत्तरेकडील बर्फाच्छादित पर्वतावरुन वाहणाऱ्या वाऱ्यामुळे हा गारठा वाढला आहे. त्यातही सोमवारी व मंगळवारी किमान तापमानात अजुन घट होईल.- रामचंद्र साबळे, हवामान तज्ञ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.