आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन‎:भारतीय संविधान समता, स्वातंत्र्य,‎ न्याय, बंधुता मूल्यावरच आधारित‎

धुळे‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय संविधान समता, स्वातंत्र्य,‎ न्याय आणि बंधुता या मूल्यांवर‎ आधारित असून, ते केवळ कायद्याचे‎ पुस्तक नाही तर राष्ट्राची एकात्मता‎ अखंडता व संप्रभुता प्रवर्धित करण्याचे ‎ ‎ साधन आहे. त्यातील मूल्ये देशातील ‎समस्यांचे निवारण करण्यासाठी आहेत.‎ म्हणून त्याची सर्वांना ओळख होण्याची‎ आणि त्यावर आचरण तसेच रक्षण‎ आणि जपणूक करण्याचे आम्हा‎ भारतीयांचे आद्य कर्तव्य व नैतिक‎ दायित्व आहे, असे प्रतिपादन इंजिनिअर‎ जैनुल आबेदीन शेख यांनी सर्वधर्म‎ संघाच्या वर्धापन सोहळ्यात मुख्य‎ मार्गदर्शक म्हणून बोलताना केले.‎

आयस्काँनचे अध्वर्यू प्राचार्य व्ही. के.‎ भदाणे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.‎ राष्ट्रपिता म.गांधीजींच्या स्मृतिदिनी सेंट‎ अॅन्स कॅथॉलिक चर्चच्या प्रांगणात‎ सर्वधर्म संघाच्या ३२ व्या स्थापना‎ दिनाच्या कार्यक्रमात मूव्हमेंट फॉर‎ पीसचे राज्य कोषाध्यक्ष इंजि. शेख‎ बोलत होते. ‎याप्रसंगी अंधश्रद्धा निर्मूलन‎ समितीचे अविनाश पाटील, डॉ. मृदुला‎ वर्मा, हाजी करीम न्हावकर, पोपटराव‎ चौधरी, विजयकुमार अग्रवाल, पी. सी.‎ पाटील, रईस कतील, शाहीर माणिकराव‎ शिंदे, मुमताज नादीर, डॉ. विजय चंद्र‎ जाधव, नाजनीन शेख, सुरेश बैसाणे‎ आदी मान्यवर उपस्थित होते.

सुलोचना‎ अग्रवाल, डॉ. शरद वाणी, मेजर राजू‎ मशाल, ए. जी. शेख, प्रतिभा नेवे, अॅड.‎ असिफ शेख, श्रीकृष्ण बेडसे, अब्दुल‎ करीम पटेल आदी उपस्थित होते. शेख‎ हुसेन गुरुजी यांनी प्रास्ताविक केले.‎ रंजना नेवे यांनी सूत्रसंचालन केले.‎

बातम्या आणखी आहेत...