आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या २४७ वाहन चालकांचे लायसेन्स आरटीओ विभागाने तीन महिन्यांसाठी रद्द केले आहे. बेशिस्त वाहन चालकांना चाप लागावा या उद्देशाने हा निर्णय झाला आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या मोठी असून दरवर्षी त्यात वाढच होते आहे. या प्रकाराला आळा बसावा यासाठी जिल्ह्यासह शहरातील २४७ वाहन चालकांचा वाहन चालवण्याचा परवाना तीन महिन्यांसाठी रद्द करण्यात आला आहे.
त्यात दुचाकी, चारचाकी व अवजड वाहन चालकांचा समावेश आहे.याविषयीचा प्रस्ताव शहर वाहतूक शाखा व पोलिस दलाने प्रादेशिक परिवहन विभागाला पाठवला होता. त्यानंतर आरटीओ विभागाने ही कारवाई केली. शहर वाहतूक शाखेने १ एप्रिल २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई केली होती. या कारवाईतील वाहन चालकांचे लायसेन्स रद्द झाले आहे
का केली कारवाई
पोलिसांच्या माहितीनुसार विना हेल्मेट, मद्यपान करून वाहन चालवणे, चालत्या वाहनांवर मोबाइलवर बोलणे, ट्रिपल सिट वाहन चालवणे आदी कारणांमुळे लायसेन्स रद्द करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.