आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध भागात मोबाइल टॉवर उभारण्यात आले आहे. टाॅवर कंपन्यांनी मालमत्ता कर न भरल्याने मनपाने टाॅवर सील केले. अनेक भागात मोबाइलला रेंज मिळत नसल्याने नागरिकांची गैरसोय होते आहे. गेल्या आठ दिवसांपासून पेठ विभागातील सर्व व्यापारी प्रतिष्ठानचे व्यवहार विस्कळीत झाले आहे. त्यामुळे याविषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. मनपाने मोबाइल टॉवर सील केल्याने पेठ भागातील नागरिक व्यापारी, डॉक्टरांनी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख कैलास मराठे यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानुसार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोबाइल कंपनीच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, पेठ भागातील गल्ली क्रमांक ४, ५, ६ या भागात राष्ट्रीयीकृत बँका, व्यापारी प्रतिष्ठान, मेडीसीन मार्केट, हाॅस्पिटल आहे. या सर्व प्रतिष्ठानाचे व्यवहार ऑनलाइन असून सर्वांचे व्यवहार आठ दिवसांपासून ठप्प आहे.
त्यामुळे याविषयाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी भटू शेठे, सागर भडागे, राहुल धात्रक, दिलीप जगताप, बाॅबी शेख, सोमेश कानकाटे, राज चव्हाण, प्रितम लोखंडे, अजिज शेख, शंतनु लोखंडे, ऋषिकेश मराठे आदी उपस्थित होते. त्यामुळे मोबाइल कंपन्यांनी तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.