आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडी हाेते. ही बाब लक्षात घेत महापालिकेने काही दिवसांपूर्वी अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू केली हाेती. पण आता ही मोहीम पुन्हा ठप्प झाली आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल, फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. तसेच संतोषी माता मंदिर परिसर, महापालिका इमारतीचा परिसर, देवपूर, पाचकंदील, साक्री रोड आदी भागात रस्त्यावर फळ व भाजी विक्रेते बसलेले असतात.
त्यामुळे या रस्त्यांवर वारंवार वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे महापालिकेने अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेतला. कारवाई बारा पत्थरपासून मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारण्यात येऊन गॅरेज व्यावसायिकांना या रेषेच्या पुढे येण्यास मनाई करण्यात आली. पण काहीही उपयोग झाला नाही. तसेच अतिक्रमण निर्मूलन मोहीम ठप्प झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.