आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. आता आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या हालचाली सुरू आहे. दुसरीकडे समग्र शिक्षा प्रकल्पांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पाच वर्षांपासून वेतनवाढ झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे. समग्र शिक्षा अभियान राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने सुरू आहे.
या प्रकल्पांतर्गत विविध पदावर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी कार्यरत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या कर्मचाऱ्यांना वेतनवाढ नाही. वेतनवाढ मिळावी यासाठी नोव्हेंबरमध्ये प्रस्ताव पाठवण्यात आला. त्यानंतर दोन महिन्यांनी त्रुटी काढून फाइल परत पाठवण्यात आली. याविषयावर शिक्षण मंत्र्यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. पण वेतनवाढीविषयी कोणताही निर्णय झाला नाही. अभियानात २५ वर्षांपासून अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीने काम करत आहे. त्यामुळे त्यांना वेतनश्रेणी लागू करावी यासाठी कर्मचाऱ्यांनी मुंबईत धरणे आंदोलन सुरू केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.