आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदखेडा तालुक्यासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शनिवारी रात्री अवकाळी पावसासह गारपीट झाली. त्यामुळे गहू, मका, हरभरा, ज्वारी, कांदा आदी पिकांचे नुकसान झाले. गुरांसाठी साठवलेला चाराही ओला झाला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून , प्रशासनाने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ भरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याविषयी मंडळ अधिकारी नथू माळी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी माजी नगरसेवक सूरज देसले, महेश गुरव, योगेश सोनवणे, अक्षय वाणी, तुषार पाटील, सुमीत गिरासे, नितीन गुरव, सचिन पाटील, विकास राजपूत, दर्शन पाटील, चेतन गिरासे, अंकुश शिंदे, समाधान मराठे आदी उपस्थित होते. गहू, हरभरा, मका आदी पिके काढणीवर आलेली असताना अवकाळी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तसेच बहुतांश शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यात गहू काढणीचे नियोजन केले होते. पण पाऊस व वादळामुळे हाता तोंडाशी आलेला घास निसटला आहे. त्यामुळे प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.