आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पोलिसांनी गुन्हेगारीला‎ चाप लावावा ; आ. पटेल‎

शिरपूर‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील क्रांती नगरातील राहुल भोई‎ या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या‎ झाली. महिन्याभरात दोन तरुणांची‎ हत्या झाल्याने नागरिकांमध्ये चिंता‎ आहे. शहरातील गुन्हेगारीवर‎ पोलिसांनी अंकुश लावण्यासाठी‎ उपाययोजना करावी, अशी मागणी‎ आमदार अमरीश पटेल यांनी प्रसार‎ माध्यमांशी बोलताना केली. आमदार‎ अमरीश पटेल यांनी सांगितले की,‎ शिरपूर शहराची शांततेसाठी ओळख‎ आहे.

पण काही दिवसांपासून‎ गुन्हेगारी घटना वाढल्याने शहराची‎ शांतता धोक्यात आली आहे.‎ क्रांतीनगर परिसरात दहशत‎ पसरवणाऱ्यांसह शहरातील इतर‎ भागात गुन्हेगारी कृत्य करणाऱ्यांवर‎ पोलिसांनी ठोस कारवाई करण्याची‎ गरज आहे. याविषयी शिरपूर शहर‎ पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम‎ आगरकर यांच्याशी चर्चा करणार‎ आहे.

राहुल भोई हत्या प्रकरणातील‎ एकही आरोपी मोकाट सुटता कामा‎ नये. पोलिसांनी रात्री दहा वाजेनंतर‎ गस्त वाढवण्याची गरज आहे. तसेच‎ खून प्रकरणी सर्व आरोपींना अटक‎ करावी. शहरातील मुख्य चौकांमध्ये‎ तरुणांचे टोळके उभे राहून गैरकृत्य‎ करतात. त्यांना चाप लावावा.‎ शहरातील कॅफे संस्कृती बंद करावी.‎ नागरिकांनीही सहकार्य करावे असेही‎ आमदार पटेल यांनी स्पष्ट केले.‎

बातम्या आणखी आहेत...