आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य‎:रायला महोत्सवात विद्यार्थी दंग‎

नाशिक‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ‎आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या‎ संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात‎ आयोजित केलेल्या ‘रायला महोत्सव’‎ दरम्यान आदिवासी भागातील मुलांना ‎विद्यापीठाचा दृक श्राव्य स्टुडिओ‎ दाखविण्यात आला. हा स्टुडिओ पाहून मुले ‎ ‎ भारावून गेली. आमच्या आयुष्यात‎ पहिल्यांदाच एवढा मोठा स्टुडिओ पाहून ‎आनंदाला उधाण आल्याचे मुलांनी‎ सांगितले.

यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू ‎ ‎ फुललेले पाहायला मिळाले.‎ ग्रामीण आदिवासी भागातील मुलांमध्ये‎ नेतृत्वगुण विकसित व्हावेत, त्यांच्या‎ व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि त्यांच्या‎ जीवनाला नवी दिशा मिळावी या उद्देशाने‎ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ‎ आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक यांच्या‎ संयुक्त विद्यमाने मुक्त विद्यापीठात ‘रायला‎ ‎महोत्सव २०२३’चे आयोजन करण्यात आले‎ आहे. हा महोत्सव शुक्रवार दि. ३ ते ५‎ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवस चालणार आहे.‎

विशेष म्हणजे, या महोत्सवात नाशिक‎ जिल्ह्यातील आश्रम शाळांतील तब्बल १००‎ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सहभागी झाले‎ आहेत. विद्यापीठाच्या दृक श्राव्य केंद्राच्या‎ माध्यमातून शैक्षणिक कार्यक्रमांची निर्मिती‎ कशी केली जाते. स्टुडिओचे कामकाज‎ कसे चालते, त्याची रचना कशी असते‎ याबाबत संतोष साबळे यांनी मुलांना माहिती‎ दिली. मुलांनाही चित्रफीत नेमकी कशी‎ बनते याचे कुतूहल असल्याने त्यांनी मनातले‎ प्रश्न विचारून जाणून घेतले.‎ महोत्सवाच्या दरम्यान मुलांची सह्याद्री‎ फार्मर्स कंपनीला भेट घडवून आणली.‎

शेतकऱ्यांच्या सहभागातून उभी केलेल्या या‎ कंपनीचा विस्तार आणि उत्पादने पाहून‎ मुलांचा आनंद गगनाला भिडला होता. रस्ता‎ सुरक्षेबाबत सतीश मंडोरा, दहावी बारावी‎ नंतरच्या करिअर संधीबाबत विक्रम‎ बालाजीवाले यांचे करिअर मंथन, अनिरुद्ध‎ अथणी आणि डॉ. श्रिया कुलकर्णी यांचा‎ फिटनेस मंत्र, ब्राह्मणवाडेच्या आश्रम‎ शाळेतील विद्यार्थिनींनी केलेले कीर्तन अशा‎ विविध कार्यक्रमांचा मुलांनी आनंद लुटला.‎ रोटरीचे प्रांतपाल आनंद झुनझुनूवाला‎ यांनीही विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद‎ साधला.‎

आज समाराेप‎
महोत्सवाचा रविवारी ((दि. ५) शेवटचा‎ दिवस असून मुलांना विद्यापीठाच्या कृषी‎ प्रक्षेत्राची सफर घडवून आणली जाणार‎ आहे. कम्युनिटी सर्व्हिस संचालक तथा‎ कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ हेमराज राजपूत‎ हे ग्रामविकासात कृषी विज्ञान केंद्राचे‎ योगदान यावर राजपूत हे मार्गदर्शन करणार‎ आहेत. समारोप दुपारी एक वाजता‎ आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त‎ नयना गुंडे यांच्या उपस्थितीत होणार आहे.‎

बातम्या आणखी आहेत...