आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराधुळे तालुक्यातील हरसुणे गावात बालविवाह होणार असल्याची निनावी तक्रार चाइल्ड लाइनच्या हेल्पलाइनवर झाली होती. त्यानुसार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण समितीने या तक्रारीची पडताळणी करत तीन बालविवाह रोखले. धुळे तालुक्यातील हरसुणे गावात बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बुवनेश्वरी एस व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सचिन शिंदे यांच्या सूचनेनुसार परिविक्षाधीन अधिकारी राकेश नेरकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सतीश चव्हाण, तृप्ती पाटील, देवेंद्र मोहन, चाइल्ड लाइनच्या प्रतिनिधी प्रतीक्षा शिरसाठ यांच्या पथकाने हरसुणेचे पोलिस पाटील, ग्रामसेवक, सरपंच यांच्याशी संपर्क साधला.
तसेच पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी प्रकरणाची दखल घेत हरसुणे गाव गाठले. मुलगा व मुलगीच्या जन्म दाखल्याची तपासणी केली. ज्या मुलीचा विवाह होणार होता ती १८ वर्षापेक्षा कमी असल्याचे आढळून आले. त्यामुळे मुलगा व मुलीच्या पालकांचे समुदेशन केले. त्यांना बालविवाहाचे दुष्परिणाम व बाल विवाह प्रतिबंध अधिनियम २००६ नुसार होणाऱ्या कारवाईची माहिती दिली. मुलीच्या वडिलांकडून मुलीचा १८ वर्षे पूर्ण होईपर्यंत विवाह करणार नाही असे हमीपत्र लिहून घेतले. याच गावात दोन अल्पवयीन सख्ख्या बहिणीचाही एकाच मांडवात विवाह होणार होता. हे दोन्ही बालविवाह रोखण्यात यंत्रणेला यश आले. याच गावात अन्य एका अल्पवयीन मुलाचा साखरपुडा झाल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार हा बालविवाह रोखण्यात आला. राकेश नेरकर, सतीश चव्हाण, देवेंद्र मोहन, प्रतीक्षा शिरसाठ, सुनील जावरे, जिल्हा परिषद सदस्य पाटील, सरपंच भीमराव पगारे, ग्रामसेवक एस. आर. उदीकर यांच्या सहकार्याने विवाह रोखले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.