आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासकीय सेवेत असलेल्या बोगस आदिवासींवर कारवाई करून त्यांची सेवा समाप्त करावी, या मागणीसाठी येथील तहसील कार्यालयासमोर आदिवासी एकता परिषद व आदिवासी टायगर सेनेतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात आदिवासी एकता परिषदेचे तालुका सचिव गुलाब सोनवणे, आदिवासी टायगर सेनेचे अध्यक्ष भुपेंद्र देवरे, किशोर ठाकरे, अप्पा सोनवणे, नाना कुवर, सुरेश सोनवणे, शानाभाऊ सोनवणे, दीपक फुले, एकनाथ भील, शंकर मोरे, रामनाथ मालचे, दीपक मोरे, मोतीलाल सोनवणे, भुरा सोनवणे, युवराज पवार, रवी चव्हाण, एकनाथ धनगरे, प्रकाश पाडवी, सुनील मोरे सुरेश मालचे, गोपाल फुले आदी उपस्थित होते. शासनाच्या सेवेत असलेल्या बोगस आदिवासींवर तत्काळ कारवाई करून त्यांची सेवा समाप्त करावी.
तसेच पात्र आदिवासींना शासनाच्या सेवेत घ्यावे, राज्यात १२ हजार ५०० बोगस आदिवासींनी नोकऱ्या बळकावल्या आहे. शासनाने त्यांना बडतर्फ न करता १४ डिसेंबर २०२२ रोजी संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा असून त्याकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन झाले. या वेळी चुकीच्या धोरणाविरोधात घोषणा दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.